पश्चिम महाराष्ट्र

JantaCerfew : आता सातारा जिल्ह्यातील 'या' शहरात पुन्हा दाेन दिवस जनता कर्फ्यू

सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड ः शहरात तीन व चार एप्रिल रोजी जनता कर्फ्यू होत आहे, अशी माहिती मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी दिली. त्या दोन दिवसांच्या कालवधीत जीवनावश्यक सेवाही बंद राहणार आहे. त्यामुळे नागरीकांनी त्यांची सोय करावी, असेही आवाहन मुख्याधिकारी डांगे यांनी केले आहे.

शहरातील जीवनाश्यक सेवेसह सर्वच व्यवहार लॉकडाऊन ठेवले जाणार आहेत. शहरात सध्याची स्थिती लक्षात घेता पालिका प्रशासनाने निर्णय घेतला आहे. कोरोनाची स्थिती येथे गंभीर स्वरूप धारण करत आहे. त्याला रोखण्यासाठी सलग दोन दिवसांचा लॉकडाऊन अत्यवश्यक आहे, असे डांगे यांनी स्पंष्ट केले

ते म्हणाले, सध्या संचारबंदी सध्याच्या काळात नागरीक बाहेर फिरत आहेत. वेगवेगळी कारमे सांगून नागरीक रस्त्यावर फिरताना दिसतात. पोलिसांनी जवळपास 150 वाहने जप्त केली आहेत. जप्त कलेली वाहनांवरील नागरीक विनाकारण फिरताना आढळले आहेत. तरिही नागरीकांचे फिरणे कमी झालेला नाही. पोलिस, पालिका यंत्रणांनी सांगून नागरीक एकत नाहीत. त्यामुळे पूर्ण लॉकडाऊनचा निर्णय जाहीर करत आहोत. त्यासाठी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, पोलिस व जिल्हा प्रशासनास कल्पना दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 मार्चला जनता कर्फ्यू पुकारला होता. त्यावेळी शहरातील सर्वच व्यवहार लॉकडाऊन होते. जनता कर्फ्यू पुढे राज्य शासनाने कायम ठेवला आहे. मात्र नागरीक त्याला न जुमनाता रस्त्यावर फिरत आहेत. त्या स्थितीचे गांभीर्य लक्षात घेवून दोन दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी आजपासून शहरात रिक्षा फिरवली जाणार आहे.

चमकण्यासाठी माेदी एकही संधी साेडत नाहीत काॅंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांची टीका 

श्री. डांगे म्हणाले, शहरात नागरीकांना भाजीपाला, किराणामाल घरपोच दिला आहे. शहरातील नव्वद टक्के लोक संचारबंदीच्या  नियमांचे पालन करून घरात बसली आहे. मात्र काही लोक विनाकारण फिरत आहेत. त्यांच्या अशा वागण्याने भविष्यात धोका होवू शकतो. ती स्थिती लक्षात घेवून कोरोनाला रोखण्यासाठी शहरात तीन व चार एप्रिलला जनता कर्फ्यू घेण्यात येत आहे. पुणे, मुंबईसह परदेशातून आळेले नागरीक होम क्वारंटाईन केले आहेत. जिल्हा बंदी असल्याने अन्य जिल्ह्यातून येणारा ओघ कमी झाला असली तरी अद्यपही काही नागरीक येत आहेत. त्या  सगळ्यांवर निर्बंध लागावा यासाठी कर्फ्येूचे आय़ोजन केले आहे.


कृष्णा, सह्याद्रीत कोरोना तापसणीसाठी 10 व्हेंटीलर आणि 40 बेडची व्यवस्था ः डॉ. वैभव चव्हाण यांचा माहिती

कऱ्हाड ः कोरोनाची लक्षणे दिसणाऱ्या रूग्णांच्या तपासणीसाठी कऱ्हाडला कृष्णा व सह्याद्री हॉस्पीटलमध्ये तपासण्याची सोय केली आहे. तेथे 10 व्हेंटीलेटर आणि 40 बेडची सोय केली आहे, अशी माहिती इंडीयन मेडीकल असोशिएसन्सचे येथील अध्यक्ष डॉ. वैभव चव्हाण यांनी दिली.

ते म्हणाले, कोरोनाची प्राथमिक लक्षणे दिसणाऱ्या रूग्णांनी अन्य कोणत्याही हॉस्पीटलमध्ये जावू नये. ते तेथे गेल्यासा कोरोनाचा फैलाव होवू शकतो. त्यामुळे अशी लक्षणे दिसणाऱ्या रूग्णांची कृष्णा व सह्यद्रीमध्ये तपासणीची वेगळी सोय केली आहे. कोरोनाची लक्षणे दिसणाऱ्या रूग्णांनी सोयीनीयुक्त केंद्र उभा केले तेथे तपासून घ्यावे. कृष्णाला पाच व्हेंटीलटर व 30 बेडची व्यवस्था केली आहे. सह्याद्रीमध्ये पाच व्हेंटीलटर आणि 10 बेडची सोय केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT