ration card.jpg
ration card.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

जिल्ह्यातील एवढ्या लाख रेशनकार्डधारकांना मोफत धान्य : संचारबंदी काळात सरकारची मदत.. 21 ठिकाणी मोफत शिवभोजन थाळी 

विष्णू मोहिते

सांगली- राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढ रोखण्यासाठी राज्य सरकारने आजरात्री ( ता. 15) आठ वाजल्यापासून पंधरा दिवस संचारबंदी लागू केली आहे. या संचारबंदीचा गरीब व कष्टकरी वर्गाला फटका बसू नये यासाठी 5 हजार 476 कोटीचे पॅकेजची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये अन्न सुरक्षा योजनेतील राज्यातील सात लाख लाभार्थींना एक महिना 3 किलो गहू आणि 2 किलो तांदूळ मोफत देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील 3 लाख 94 हजार 227 कार्डधारकांना त्याचा लाभ मिळणार आहे. 

राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत दोन प्रकारच्या कार्डधारकांना धान्य वितरण करण्यात येते. यात प्राधान्य कुटुंब लाभार्थी आणि अंत्योदय धान्य योजनेच्या लाभार्थ्यांना नियमित धान्य वितरण करण्यात येते. जिल्ह्यात 3 लाख 94 हजार 227 कार्डधारक या योजनेमध्ये आहेत. या कार्डधारकांना जवळपास 9 हजार 200 टन धान्य वाटप केले जाते. या सर्व लाभार्थींना एप्रिल 2021 चे धान्य मोफत मिळणार आहे. अर्थात या धान्याचा दर अत्यल्प म्हणजे गहू दोन रुपये तर तांदूळ तीन रुपये किलो असा आहे. 

कोरोनामुळे गेल्या वर्षी संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. लोकांचा रोजगार थांबला आहे. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत मोफत तांदूळ एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांसाठी अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब योजनेतील कार्डधारकांना प्रत्येक कुटुंबातील प्रतिव्यक्ती पाच किलो तांदूळ मोफत वितरित करण्यात आले होते. 

अंत्योदय योजनेतील अनेक लाभार्थीं घरेलू कामगार, बांधकाम कामगार, फेरीवाले, रिक्षाचालक आणि घटकांत समाविष्ट आहेत. यामुळे अशा लाभार्थींनी रोखीने मदतही मिळणार आहे. या शिवाय राज्य व केंद्र सरकारच्या विविध निवृत्तीवेतन योजनेचा लाभही त्यांना मिळणार आहे. दोन महिन्यांचे वेतन आगावू मिळणार आहे. काही जण दुहेरी-तिहेरी लाभ मिळण्यास पात्र असल्याचे चित्रही समोर येत आहे. 

जिल्ह्यात 21 शिवभोजन केंद्रावर मिळणार मोफत थाळी... 
राज्य सरकारने गरीब आणि गरजू लोकांसाठी शिवभोजन योजना राबवली आहे. जिल्ह्यात एकूण 21 शिवभोजन केंद्रे आहेत. या केंद्रामधून सरासरी 3 हजार शिवभोजन थाळी देण्यात येते. गेल्या वर्षी कोरोनाच्या काळात 10 रुपयांची थाळी पाच रुपयांना वाटण्यात आली. महिन्यापूर्वी या थाळींचा पुन्हा पुवर्वत म्हणजे 10 रुपये केला होता. त्यानंतर कोरोनाची लाट सुरु झाल्याने दर 5 रुपयांवर आणला. राज्य सरकारने पुन्हा 1 एप्रिल 2021 पर्यंत संचारबंदी लागू केल्यामुळे थाळी आता मोफत मिळणार आहे. प्रत्येक केंद्रावर 150 थाळीचे निर्बंध होते. ते वाढवले जातात काय याकडे आता लक्ष आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uma Ramanan: तामिळ चित्रपटसृष्टीचा आवाज हरपला, दिग्गज गायिकेचे निधन

Prajwal Revanna: 'सेक्स टेप' प्रकरणी प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात ग्लोबल लूकआऊट नोटीस जारी

PM Narendra Modi : 'मोदींचे निधन झाले तर कोणी पंतप्रधानच होणार नाही का?' काँग्रेस आमदाराचे पुन्हा वादग्रस्त विधान

Mumbai Loksabha: कोण मारणार मुंबईत बाजी? ठाकरेंचा आत्मविश्वास 'सातवे आस्मान'पे, भाजप मात्र संभ्रमात

Latest Marathi News Live Update : अमेठीतून राहुल गांधी उद्या भरणार अर्ज? सूत्रांची माहिती

SCROLL FOR NEXT