The health problem of 15 villages will be solved after 10 years 
पश्चिम महाराष्ट्र

15 गावांचा आरोग्याचा प्रश्‍न 10 वर्षांनी मिटणार 

दिपक पवार

आळसंद : विटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र आळसंद (ता.खानापूर) येथे स्थलांतरित करण्यासाठी ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी दिलेल्या लढ्यास अखेर दहा वर्षानंतर यश आले आहे. यामुळे आळसंदसह परिसरातील पंधरा गावातील ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निकाली लागणार आहे. याबाबतचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांचे पत्र ग्रामपंचायतीस प्राप्त झाले आहे. पत्र मिळाल्यानंतर ग्रामस्थांनी आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला. 

तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल लोखंडे यांनी एक डिसेंबरला गावास भेट देऊन आरोग्य केंद्र सुरु करण्याबाबत पाहणी केली होती. ग्रामपंचायतीने तात्पुरत्या स्वरुपात चार खोल्या उपलब्ध करुन दिल्या आहेत. या ठिकाणी विटा प्राथमिक आरोग्य केंद्राकडील बाह्य रुग्ण तपासणी, स्री रुग्ण तपासणी व प्रसूतीसाठी आळसंद येथील आरोग्य उपकेंद्रातील प्रसूती खोल्या वापरात आणाव्यात तसेच कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेकरिता आळसंद येथे ऑपरेशन थिएटर उपलब्ध होईपर्यंत विटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करण्यात याव्यात, असे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती विटा (खानापूर), तालुका वैद्यकीय अधिकारी, पंचायत समिती, वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र व सरपंच ग्रामपंचायत आळसंद यांना पत्राद्वारे माहिती दिली आहे. 

केंद्र सुरू व्हावे यासाठी परिसरातील 15 गावांनी ग्रामस्थांच्या आरोग्य सेवेच्या दृष्टीने विटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे स्थलांतर करुन आळसंद येथे सुरु करण्यात यावे, अशी मागणी संबंधित ग्रामंपंचायतींच्या सरपंचांनी ठरावाद्वारे केली होती. मात्र, आळसंद येथे आरोग्य केंद्र सुरु करण्याबाबत होत असलेल्या दिरंगाईमुळे आळसंद ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच इंदूमती जाधव व माजी उपसरपंच नितीन जाधव यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. 

या गावांना होणार फायदा... 
आळसंद , बलवडी (भा.), तांदळगाव, खंबाळे (भा.), वाझर, जाधवनगर, भाळवणी, कमळापूर , पंचलिंगनगर, कंळबी ढवळेश्वर, मेंढ, उमरकांचन यासह अन्य गावांना फायदा होणार आहे. 

विटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र आळसंदला स्थलांतरित करण्याचा घेतला निर्णय स्वागर्तह आहे. ग्रामस्थांच्या लोक लढ्याला यश आले आहे. 
- इंदुमती जाधव, सरपंच, आळसंद.

संपादन : प्रफुल्ल सुतार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावरही लाचेचा मोह! नायब तहसीलदार ४० हजारांची लाच घेताना कार्यालयातच रंगेहाथ पकडला, नोटांना लावली होती पावडर अन्‌...

Onion Bhavan: शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक पाऊल! जगातील पहिले ‘राष्ट्रीय कांदा भवन’ महाराष्ट्रात होणार; पण कुठे? जाणून घ्या...

Railway Jewellery Theft : रेल्वे प्रवाशांना मदतीचा बहाणा; ४० लाखांचे हिरेजडित दागिने लंपास करणारी आंतरराज्यीय टोळी गजाआड!

Sai Jadhav : महाराष्ट्राच्या लेकीने घडवला इतिहास!, सई जाधव ठरली ९३ वर्षानंतर 'टेरिटोरियल आर्मी'ची पहिली महिला ‘लेफ्टनंट’

IND vs SA: शेवटच्या दोन T20I सामन्यांसाठी टीम इंडियात दोन वर्षांनी या अष्टपैलूचं पुनरागमन! अक्षर पटेलची घेणार जागा

SCROLL FOR NEXT