Institutional quarantine for those coming from Maharashtra in belguam 
पश्चिम महाराष्ट्र

महाराष्ट्रातून कर्नाटकात जायचे आहे असा आहे नियम वाचा....

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : दिल्लीपाठोपाठ तमिळनाडूहून येणाऱ्यांना संस्थात्मक क्वारंटाईनची अट मागे घेतली असून, केवळ महाराष्ट्राहून येणाऱ्यांना संस्थात्मक क्वारंटाईनची सक्ती कायम ठेवली आहे. 7 दिवस संस्थात्मक आणि 7 दिवस होम क्वारंटाईनची सक्ती करण्यात आली आहे. आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकारी स्तरावर 26 जूनला या संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानंतर सुधारीत आदेश जारी केला. 

देशात विविध राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढतोय. पण, महाराष्ट्रात साथ वेगाने फैलावत आहे. त्याचा कर्नाटकावर परिणाम होत आहे. रुग्णांची संख्या येथे वाढत आहे. तसेच भविष्यात संख्या वाढण्याची शक्‍यता आहे. यामुळे महाराष्ट्राहून येणाऱ्यांसाठी निर्बंध कायम ठेवले आहे. सात दिवस संस्थात्मक क्वारंटाईनची अट कायम ठेवली आहे. त्यानंतर सात दिवसांचे होम क्वारंटाईन व्हावे लागेल, असा उल्लेख आदेशात आहे. 

महाराष्ट्राहून येणाऱ्यांना संस्थांत्मक क्वारंटाईन 

गेल्या आठवड्यामध्ये दिल्ली, तमिळनाडू येथून येणाऱ्यांसाठी 3 दिवस संस्थात्मक व  11 दिवस होम क्वरंटाईनची सक्ती करण्यात आली होती. पण, या नियमावलीत आता सुधारणा केली आहे. वरील दोन्ही राज्याहून येणाऱ्यांसाठी 14 दिवस होम क्वारंटाईनची सक्ती केली आहे. अत्यावश्‍यक सेवा आणि वाहतूक आणि वैद्यकीय उपचार संबधीत प्रवासासाठी अट शिथिल करण्यात आली आहे. पण, त्याबाबतचे दाखले सादर करणे जरुरी असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ट्रॅफिकला ब्रेक लागणार! १ तासाचा प्रवास आता फक्त १० मिनिटांत होणार; पूर्व-पश्चिम मुंबई जोडणारा गेमचेंजर प्रकल्प आहे तरी काय?

IPL 2026 Second Phase Schedule: इंडियन प्रीमिअर लीगच्या पुढील ५० सामन्यांचे वेळापत्रक जाहीर, १३ एप्रिल ते २४ मे रोजी रंगणार सामने

युद्धामुळे संकट! केंद्र सरकार मोठा निर्णय घेणार? PM मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार, बोलावली बैठक

Mumbai News: मिठी नदीची साफसफाई केली जाणार, नऊ लाख टन गाळ उपशाचे उद्दिष्ट; कधीपासून काम सुरू होणार?

तुम्हाला माहिती आहे का? ‘धुरंधर’चं शूटिंग संजय दत्तच्या शाळेतच झालंय! 'हे' कलाकारही आहेत माजी विद्यार्थी

SCROLL FOR NEXT