karad
karad 
पश्चिम महाराष्ट्र

कऱ्हाड पालिकेचा वसुंधरा पुरस्काराने मुख्यमंत्र्याच्या हस्ते गौरव 

सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड : राज्यातील पालिका, महापालिकांनी पर्यावरण जपण्यासाठी व त्याची जागरूकता वाढविण्यासाठी योगदान देण्याची गरज आहे. शासनाच्या पर्यावरण पुरक धोरणाला शहरी, निमशहरी भागात प्रत्येक घटकापर्यंत पोचविण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

मुंबई वसुंधरा पुरस्काराचे वितरण आज झाले. कऱ्हाड पालिकेचा मुख्यमंत्री फडणवीस यांच्याहस्ते गौरव करण्यात आला. यावेळी शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे उपस्थीत होते. दोघांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या हॉलमध्ये पुरस्काराचे वितरण झाले. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. येथील नगराध्यक्षा सौ. रोहणी शिंदे, नियोजन सभापती विजय वाटेगावकर, आरोग्य सभापती गजेंद्र कांबळे, बांधाकम सभापती हणमंत पवार, मुख्याधिकारी यशवंत डांगे, नगरसेवक सौरभ पाटील, किरण पाटील, अतुल शिंदेसह ओकार मुळे, आरोग्य अभियंता आर. डी. भालदार यांनी पुरस्कार स्विकरला. शासनातर्फे रोख रक्कम, पारितोषिक व सन्मान चिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी काही स्वच्छता दूत म्हणून काम करणाऱ्यांनाही पालिकेने खास वाहनाने पुरस्कार स्विकारण्यासाठी नेले होते. 

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राज्यातील अनेक पालिकांनी स्वच्छ सर्वेक्षणात चांगले काम केले आहे. त्यामुळे शहरी भागात स्वच्छता नांदत आहे. स्वच्छतेबरोबरच पर्यावरण पुरक वातावरण निर्माण होण्यासाठी विशेष प्रयत्न होण्याची गरज आहे. त्या पालिकांचाही विशेष गौरव केला जाईल. वसुंधरा पुरस्कार प्राप्त झालेल्या पालिकांनी आता त्यांची जबाबदारी वाढली आहे, याचे भान ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळे अधिक चांगल्या पद्धतीने पर्यावरण रक्षणाचा संदेश सामान्य लोकाप्रंयत पोचवण्याची गरज आहे.

शिवसेना नेते आदित्य ठाकरे म्हणाले, युती सरकारने अधिक चांगल्या पद्धतीने काम केले आङे. सामान्य जनता हाच केंद्र बिंदू मानून काम केल्याने शहरी भागातही विशेष स्वच्चता दिसते आहे. पर्यावरण स्वच्छ रहावे, स्वच्छ सर्वेक्षणातून स्वच्छता वाढावी, यासाठी विशेष प्रयत्न करणाऱ्य़ा पालिकांचे अभिनंदन करेल, तेवढे कमी आहे. त्यांनी अशाच पद्धतीने यापुढेही काम केले पाहिजे. ती त्यांची जबाबदारी आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunetra Pawar: बारामतीत सुनेत्रा पवारांची उमेदवारी भाजपच्या दबावातून दिली का? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

MI vs KKR Live IPL 2024 : अय्यरची 70 धावांची खेळी, मुंबईसमोर विजयासाठी 170 धावांच आव्हान

SSC-HSC Result 2024 : सीबीएसईचा दहावी-बारावीचा निकाल २० मे नंतर होणार जाहीर

West Indies T20 WC 24 Squad : विंडीजच्या संघात सगळे स्टार मात्र इन फॉर्म जादूगारच मिसिंग

SCROLL FOR NEXT