पश्चिम महाराष्ट्र

खंबाटकीत प्रवास म्हणजे  कुटुंबाच्या जीवाला घोर! 

सकाळवृत्तसेवा

खंडाळा - खंबाटकी घाटात होणाऱ्या अपघातांच्या मालिकेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या घाटातून प्रवास करणाऱ्या प्रत्येकाच्या नातेवाईकाला त्याच्या सुरक्षेची काळजी वाटत आहे. त्यामुळे खंबाटकी घाट म्हणजे जीवाला घोर अशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. 

खंडाळा व परिसरातील अनेक गावांतील नागरिक नोकरी व व्यवसायानिमित्त सातारा व वाई बाजूकडे दररोज ये-जा करतात. संपूर्ण घाटात आजअखेर झालेले एकूण अपघात, त्यातील मृतांचा आकडा व गंभीर जखमींची संख्या पाहता ही आकडेवारी कुटुंबीयांना घोर लावणारीच आहे. खंबाटकी घाटातील फक्त "एस' वळणावर 2008 पासून 116 अपघात झाले असून 73 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 273 जण गंभीर जखमी झालेत. या "एस' वळणाने अनेक कुटुंबांवर अस्मानी संकट कोसळले आहे. खंडाळा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अपघातांची संख्या पाहता 2008 पासून आजअखेर 760 अपघात झाले आहेत. त्यात 298 जणांचा बळी गेला आहे, तर एक हजार 199 लोक गंभीररित्या जखमी झालेत. यातील अनेक अपघात खंबाटकी घाटातील आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT