पश्चिम महाराष्ट्र

#KolhapurFlood बागल चाैक कब्रस्थान, कसबा बावडा स्मशानभूमीत पाणी

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - बागल चौकातील कब्रस्थान, तसेच कसबा बावडा येथील स्मशानभूमीत पाणी आल्यामुळे अंत्यसंस्कारासाठी मृतदेह अन्य ठिकाणी नेण्याची वेळ आहे. पाचगाव, उचगाव, लाईन बाजार याठिकाणी मृतदेहावर अंत्यसंस्काराची व्यवस्था करण्यात आली आहे. 

कोल्हापूर शहर पाण्यात गेले आहे. शहराबाहेरील आणि अंतर्गत रस्ते पुराने वेढले आहेत. याचा फटका कब्रस्थान बसला आहे. मुस्लिम समाजाचे कब्रस्थान शहरातील मध्यवस्तीत असलेल्या बागल चौकात आहे. सध्या बागल चौकातील कब्रस्थानमध्ये तीन फुट पाणी आले आहे. परिणामी गेल्या दोन दिवसात एकही मृतदेह या कब्रस्तानमध्ये जाऊ शकला नाही. परिणामी कोल्हापूरपासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या पाचगाव डोंगरावर, दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या उचगावमध्ये,आणि शहराच्या एका बाजूला असलेल्या लाईन बाजारच्या कबरस्थानाचा वापर करावा लागत आहे.

दरम्यान कसबा बावडा येथील स्मशानभूमीत सुद्धा पुराचे पाणी आल्यामुळे गेल्या दोन दिवसात एक ही मृतदेह तेथे पोहोचू शकला नाही. परिणामी कसबा बावडा आणि परिसरातील मृतदेह पंचगंगा नदी परिसरातील मुक्तिधाम स्मशानभूमीत घेऊन जावेत असे आवाहन करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT