पश्चिम महाराष्ट्र

कोल्हापूर : पुरात पिकाच्या नुकसानीमुळे तिटवेत शेतकऱ्याची आत्महत्या 

सकाळ वृत्तसेवा

सरवडे -  महापुरात झालेल्या ऊस व भात पिकाच्या नुकसानीचा धक्का सहन न झाल्याने तिटवे (ता. राधानगरी) येथील शेतकऱ्याने तणनाशक प्राशन केले. उपचार सुरू असताना आज पहाटे त्यांचा मृत्यू झाला. पांडुरंग ऊर्फ बाळू हरी पाटील (वय 67) असे या शेतकऱ्याचे नाव आहे.

तिटवे येथील पांडुरंग पाटील दोन मुले व भावासह एकत्र शेती करतात. त्यांची घरची 30 गुंठे शेती आहे. याशिवाय कर्ता म्हणून ते अन्य शेतकऱ्यांची एक एकर शेती कसतात. पूर ओसरल्यानंतर मंगळवारी सकाळी दहा वाजता मळी व आर्जी या शेतातील पिके पाहण्यासाठी ते गेले होते. आठ ते दहा दिवस पिके पाण्याखाली असल्याने वाचण्याची शक्‍यता नव्हती. 

पीक गेल्यामुळे आता कोणतेही उत्पन्न मिळवू शकत नाही. हा धक्का त्यांना सहन झाला नाही. घरी आल्यानंतर त्यांनी कुटुंबातील सर्वांना शेती वाहून गेल्याबद्दल सांगितले व वैफल्यग्रस्त अवस्थेत पुन्हा ते शेताकडे गेले. शेतामध्ये ते तळमळत असताना ग्रामस्थांना दिसले.

यावेळी त्यांनी तणनाशक प्यायल्याचे निष्पन्न झाले. तत्काळ ग्रामस्थांनी त्यांना कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र बुधवारी पहाटे उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यांना शेती व बैलांची खूप आवड होती. त्यांची पत्नी व मुलाने हंबरडा फोडल्याने वातावरण अस्वस्थ झाले होते. आज सकाळी तिटवे गावात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. 

शेतकऱ्यांना तत्काळ मदत देण्याची गरज 
जिल्ह्यात महापुरामुळे पिके वाया गेली आहेत. भात पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. ऊस पिकानेही नांगी टाकली आहे. त्यामुळे यावर्षी सरसकट सर्वच शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. राज्य सरकारने याबाबतीत पंचनाम्यासंदर्भात उशीर न लावता शेतकऱ्यांना तत्काळ शेतावरच नुकसानभरपाई देण्याची गरज निर्माण झाली आहे, अशी मागणी स्वाभिमानी पक्षाचे जिल्हा युवा अध्यक्ष अजित पोवार यांनी "सकाळ'शी बोलताना केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT