पश्चिम महाराष्ट्र

वातावरणातील बदलामुळे ढगफुटीसदृश पाऊस ः प्रा. जोशी 

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर -  ‘हवेचे प्रदूषण, वातावरणातील बदल यांमुळे संपूर्ण ऋतुचक्र बिघडले आहे. बिघडलेल्या वातावरणामुळेच कोल्हापुरात बुधवारी मध्यरात्री ढगफुटीसारखा पाऊस पडला,’ अशी माहिती केआयटीच्या पर्यावरण अभियांत्रिकी विभागाचे प्रा. सौरभ जोशी यांनी ‘सकाळ’ला दिली.

ते म्हणाले, ‘‘अमेरिकेला इर्मा आणि कॅरेबियन बेटाला हार्वे चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे. ताशी पाचशे ते सातशे किलोमीटर वेगाने वारे वाहत होते. त्या वादळाचाही परिणाम कालच्या पावसावर  झाला. ग्लोबल रेन इम्पॅक्‍टचाच हा परिणाम आहे. अलीकडे वातावरणातील आर्द्रतेचे प्रमाण वाढले आहे. खरे म्हणजे हा परतीचा पाऊस आहे; मात्र वातावरणातील बदलामुळे ढगांच्या जाडीत वाढ झाली आहे. याला ‘ओरोग्राफिंग लिफ्टिंग’ असे म्हणतात. ढगांचा बॉटम शेप प्लेन असतो, त्या वेळी उच्च दाब निर्माण होतो. या काळात ढगांची हालचाल होत नाही, ते एकाच जागेवर थांबून राहतात. ढगांचे आकारमान आणि वस्तुमानात वाढ झाली आहे. एरव्ही हवेचा वेग चार ते सहा मीटर प्रति सेकंद इतका होता. पावसावेळी हा वेग ११ ते १३ प्रतिसेकंद इतका असतो. अशा प्रकारच्या पावसाला वाढते औद्योगिकीकरण आणि हवेचे प्रदूषण कारणीभूत आहे. वातावरणात कधी नाही एवढा विचित्र बदल झाल्यामुळे यापुढील काळातही असाच अचानक पाऊस कोसळत राहील. पावसाळ्यासह हिवाळा, उन्हाळा असा कोणताही ऋतू चार महिन्यांचा राहिलेला नाही. कधीही ऊन पडेल, कधीही थंडी पडेल; तर कधी पाऊसही पडू शकतो. निसर्गाचा क्रम प्रदूषणामुळे बदलून गेला आहे. नैसर्गिक स्रोत अडविणे हे कारणही पावसास कारणीभूत आहे.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salman Khan: सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरण! एका आरोपीचा पोलीस कोठडीत आत्महत्येचा प्रयत्न, प्रकृती गंभीर

Monsoon Season : यंदा 'मॉन्सून' लवकरच हजेरी लावणार; हवामानतज्ज्ञांचा अंदाज, उष्णतेमुळे पाण्याचे बाष्पीभवन वेगाने

Changpeng Zhao: बिनन्सच्या संस्थापकाला तुरुंगवास; जगातील सर्वात श्रीमंत क्रिप्टो एक्सचेंजमध्ये नेमकं काय झालं?

नाशिकचा सस्पेन्स संपला ! हेमंत गोडसे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर, शांतिगिरी महाराजांना धक्का

Latest Marathi News Live Update: मनेका गांधींनी भरला उमेदवारी अर्ज

SCROLL FOR NEXT