All but two lacs of water levy recovered 
कोल्हापूर

पाणीपट्टीचे सव्वा दोन लाख वसुल 

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर : शहर पाणी पुरवठा विभागाकडील थकीत पाणीपट्टी वसुलीसाठी आज शहरातील विक्रमनगर, शिवाजी पार्क, टाकाळा झोपडपट्टी, जुना बुधवार पेठ, ब्रम्हपूरी, बीडी कामगार वसाहत, रिंगरोड, बागवान गल्ली, देशमुख हायस्कूल, परिसरात वसुली मोहिम राबवून सुमारे सव्वा दोन लाख वसूल केले. 

थकीत पाणी पट्टीची रक्कम वसुलीसाठी शहर पाणी पुरवठा विभागातर्फे 5 वसुली पथके तयार केली असून यात फक्त महिलांचे एक पथक कार्यरत आहे. या पथकातर्फे वसुलीची कारवाई करण्यात येत आहे. दहा हजारांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या थकबाकीदारांना नोटीस पाठविल्या आहेत. या थकबाकीदारांनी मुदतीत थकीत रक्कम भरली नाही तर त्यांचे पाणी कनेक्‍शन खंडीत करुन संबंधितांचे मिळकतीवर बोजा नोंद करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. ही वसुली मोहीम येथून पुढेही सुरु राहणार आहे. 

ही कारवाई अतिरिकत आयुक्त नितीन देसाई, जल अभियंता भास्कर कुंभार व पाणीपट्टी अधिक्षक प्रशांत पंडत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे. यावेळी पथक प्रमुख के.टी.पाटील. स्वाती शहा, ज्योती सुतार, रतन पराडकर, शोभा पाटील, पार्वती पाटील, संजना पाटील, राजर्श्री पटील, अर्चना पोवार, पूजा माळी, रेखा पडळकर, संपदा पांढरे, महिला कर्मचाऱ्यांनी व भागातील मिटर रिडर्स यांनी भाग घेतला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : आज काँग्रेस करणार महात्मा गांधीच्या पुतळ्याचे रक्षण

Lottery Scam : लॉटरीच्या नावाखाली दाम्पत्याने 600 लोकांना 40 कोटींचा घातला गंडा; लोकांनी 5 ते 10 लाखांपर्यंत केली होती गुंतवणूक

Maharashtra Rain Update News : राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस, पुढील पाच दिवस महत्वाचे; ११ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

IT Park:'जमीन पसंत पडेना, आयटी पार्क होईना'; प्रशासनाचा कागदी खेळ, कृषि महाविद्यालयला पर्यायी प्रस्ताव मान्य नाही

Indian Railways: मिनिटाला निघणार दीड लाख तिकिटे; रेल्वे प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय,आरक्षण केंद्रातील यंत्रणेत बदल

SCROLL FOR NEXT