Raju Shetty 
कोल्हापूर

कॅबिनेटच्या निर्णयावर आंदोलनाची पुढची दिशा ठरवू: राजू शेट्टी

अर्चना बनगे

कोल्हापूर : पुरात बुडालेली पिकं आणि पीक कर्जाच्या मागणी संदर्भात कॅबिनेटमध्ये चर्चा झाल्यानंतर आंदोलनाची पुढची दिशा ठरवू असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणामध्ये आलेला महापूर, मराठवाड्यामध्ये नुकत्याच झालेल्या अतिवृष्टी संदर्भातील प्रश्नावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आज बैठक बोलवली होती. यावेळी शेट्टी यांनी ही माहिती दिली.

ते पुढे म्हणाले,पूर येऊन दीड महिना झाला. मात्र अजूनही शेतकऱ्यांना त्याची भरपाई मिळालेली नाही. मुख्यमंत्र्यांनी केवळ ट्विट न करता यावर आता शासन दरबारी घ्यावा. शासनाने जीआर काढून आधीच्या कर्जाची जबाबदारी घेतली पाहिजे. याचप्रमाणे विनाअट पुनर्वसन झाले पाहिजे. या मागणीचा विचार करून यावर ठोस उपाय केला पाहिजे.

शेतकरी आणि पूरग्रस्तासंबंधी मुख्यमंत्री यांनी आश्वासन दिल आहे. पुरात बुडालेली पीकं आणि पीक कर्जाच्या मागणी संदर्भात कॅबिनेटमध्ये चर्चा होणार आहे. असे शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी म्हटंल आहे. पूरग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली पंचगंगा नदीची पायी परिक्रमा पू्र्ण झाली. आता कॅबीनेटच्या निर्णयावर आंदोलनाची पुढची दिशा ठरवू असे शेट्टी यांनी म्हटले आहे.

काय आहेत प्रमुख मागण्या

-पूरग्रस्तांना 2019 प्रमाणे नुकसान भरपाई मिळावी

- आवश्यकता असलेल्या गावांचे पुनर्वसन व्हावे

- काही गावासाठी तात्पुरत्या छावण्या उभारण्यात याव्यात

- पूरग्रस्त भागातील मुलांची शैक्षणिक फी माफ व्हावी

- पडझड झालेल्या घरांच्या दुरुस्तीसाठी भरघोस मदत मिळावी

- पूरग्रस्त भागातील नदीवरील पुलांची उंची तातडीने वाढवावी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uday Samant : उद्धव ठाकरेंसोबत जाणार की नाही, उदय सामंतानी कोडं सोडवलं? कोकणातील महायुतीबाबत वक्तव्य

छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाला कसं संपवलं, ४०० वर्षापूर्वींचं AI LIVE रिपोर्टींग व्हायरल, शिवभक्त असाल तर नक्की पाहा

Latest Marathi Breaking News Live: मातोश्री परिसरात ड्रोनमुळे खळबळ!

Jalna News: आता नार्को चाचणी कराच; मनोज जरांगे यांच्या शिष्टमंडळाचे पोलिसांना निवेदन

Uddhav Thackeray: शेती, संसार उद्‍ध्वस्त; पण मदतीची दमडीही नाही, ताडबोरगावात शेतकऱ्यांनी मांडली उद्धव ठाकरेंसमोर व्यथा

SCROLL FOR NEXT