Raju Shetty
Raju Shetty 
कोल्हापूर

कॅबिनेटच्या निर्णयावर आंदोलनाची पुढची दिशा ठरवू: राजू शेट्टी

अर्चना बनगे

कोल्हापूर : पुरात बुडालेली पिकं आणि पीक कर्जाच्या मागणी संदर्भात कॅबिनेटमध्ये चर्चा झाल्यानंतर आंदोलनाची पुढची दिशा ठरवू असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणामध्ये आलेला महापूर, मराठवाड्यामध्ये नुकत्याच झालेल्या अतिवृष्टी संदर्भातील प्रश्नावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आज बैठक बोलवली होती. यावेळी शेट्टी यांनी ही माहिती दिली.

ते पुढे म्हणाले,पूर येऊन दीड महिना झाला. मात्र अजूनही शेतकऱ्यांना त्याची भरपाई मिळालेली नाही. मुख्यमंत्र्यांनी केवळ ट्विट न करता यावर आता शासन दरबारी घ्यावा. शासनाने जीआर काढून आधीच्या कर्जाची जबाबदारी घेतली पाहिजे. याचप्रमाणे विनाअट पुनर्वसन झाले पाहिजे. या मागणीचा विचार करून यावर ठोस उपाय केला पाहिजे.

शेतकरी आणि पूरग्रस्तासंबंधी मुख्यमंत्री यांनी आश्वासन दिल आहे. पुरात बुडालेली पीकं आणि पीक कर्जाच्या मागणी संदर्भात कॅबिनेटमध्ये चर्चा होणार आहे. असे शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी म्हटंल आहे. पूरग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली पंचगंगा नदीची पायी परिक्रमा पू्र्ण झाली. आता कॅबीनेटच्या निर्णयावर आंदोलनाची पुढची दिशा ठरवू असे शेट्टी यांनी म्हटले आहे.

काय आहेत प्रमुख मागण्या

-पूरग्रस्तांना 2019 प्रमाणे नुकसान भरपाई मिळावी

- आवश्यकता असलेल्या गावांचे पुनर्वसन व्हावे

- काही गावासाठी तात्पुरत्या छावण्या उभारण्यात याव्यात

- पूरग्रस्त भागातील मुलांची शैक्षणिक फी माफ व्हावी

- पडझड झालेल्या घरांच्या दुरुस्तीसाठी भरघोस मदत मिळावी

- पूरग्रस्त भागातील नदीवरील पुलांची उंची तातडीने वाढवावी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT