उत्तूर : येथील दुर्गप्रेमी असलेल्या 18 जणांच्या मित्र समुहापैकी 9 जणांनी चार दिवसात आठ किल्ले सर केले. आतापर्यंत त्यांनी 92 किल्यांची भ्रमंती करून किल्यांची माहिती संग्रह केली. या युवकांना गिरी मोहिमेची आवड निर्माण झाली आहे. गेल्या दोन वर्षात महाराष्ट्रातील विविध किल्ल्यांना त्यांनी गवसणी घातली आहे. सहा महिन्यापुर्वी त्यांनी राज्यातील सर्वात उंच असलेले कळसूबाई शिखर सर केले होते. या बद्दल त्यांचे कौतुक होत आहे.
दर महिन्याला हे युवक गिरी मोहीम आयोजित करतात. किल्यावर जायचे. संपुर्ण किल्ला फिरून बघायचा. किल्ल्यावरील ऐतिहासिक माहिती लिहून घ्यायची. काही ठिकाणांचे फोटो घ्यायचे. रात्री किल्यावरच मुक्काम करायचा. लाकडे गोळा करायची तीन दगडाची चूल तयार करायची. जेवण स्वःताच बनवायचे. दुसऱ्या दिवशी पहाटे उठून दुसरा किल्ला पाहण्यासाठी रवाना व्हायचे असा त्यांचा दिनक्रम असतो.
आठ दिवसात किल्ले डाखभैरी, पदरगड, सिद्धगड, गोरखगड, भैरवगड, निमगिरी, हनुमंतगड, शिवनेरी हे आठ किल्ले त्यांनी सर केले. यामध्ये प्रशांत ढोणूक्षे, संतोष इंगळे, प्रदिप हत्तरगे, राहूल बरडे, संदिप इंगळे, राकेश कांबळे, समाधान माने, सौरभ आरेकर, सिद्धार्थ सज्जागोळ या युवकांचा समावेश आहे.
निरीक्षणे नोंदवली
किल्ला सर करून त्या परिसराची भ्रमंती करत निरीक्षणे नोंदवली. दुर्गमार्गाने चालताना कधी दोराच्या सहाय्याने किल्ल्यावर चढाई करावी लागली, गगनस्पर्शी सुळके, घनदाट जंगल, खोल दऱ्या, धोकादायक खिंडीचा सामना करत आम्ही किल्लेसर केला.
- प्रदिप हत्तरगे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.