Uday Samant vs Uddhav Thackeray esakal
कोल्हापूर

आता गोंधळ घालणारे पालघरमध्ये साधूंची हत्या झाली, तेव्हा कुठे होते? सामंतांचा ठाकरेंसह विरोधकांना सवाल

जुने फोटो दाखवून त्याचे खापर मुख्यमंत्र्यांवर फोडणे आणि त्यांची बदनामी करणे योग्य नाही.

सकाळ डिजिटल टीम

पूर्ववैमनस्यातून गोळीबाराची घटना घडली आहे. ती घटना दुर्दैवी आहे. मात्र, त्याबाबत गृहमंत्र्यांचा राजीनामा मागणे योग्य नाही.

कोल्हापूर : ‘काल घडलेला गोळीबाराचा प्रसंग दुर्दैवी आहे. तो वैयक्तिक वादातून घडला आहे. ते ‘उबाठा’मधील (Uddhav Thackeray) गँगवॉर असून दुसऱ्याच्या माथी कशाला मारत आहात? या प्रसंगावरून आता गोंधळ घालणारे पालघरमध्ये (Palghar) अनेक साधूंची हत्या झाली तेव्हा कुठे होते?’ असा सवाल उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी आज विरोधकांबाबत उपस्थित केला.

‘दालन’ प्रदर्शनाच्या उद्‌घाटनावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मंत्री सामंत म्हणाले, ‘काल झालेल्या गोळीबाराच्या प्रसंगाचे आम्ही समर्थन करत नाही. मात्र, जुने फोटो दाखवून त्याचे खापर मुख्यमंत्र्यांवर फोडणे आणि त्यांची बदनामी करणे योग्य नाही. चांगले झाले की, आम्ही केले आणि वाईट झाले की, मुख्यमंत्र्यांनी केले असे म्हणण्याची प्रवृत्ती सध्या वाढत असून ती बंद व्हावी.

गोळीबार करणाऱ्या आणि त्यात असलेल्या तिसऱ्या व्यक्तीवरही कारवाई केली जाणार आहे. भविष्यात अशा घटनेची पुनरावृत्ती होणार नाही यादृष्टीने कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी पोलिस प्रशासनाला दिले आहेत. दरम्यान, पूर्ववैमनस्यातून गोळीबाराची घटना घडली आहे. ती घटना दुर्दैवी आहे. मात्र, त्याबाबत गृहमंत्र्यांचा राजीनामा मागणे अथवा राष्ट्रपती राजवट लागू करा, अशी मागणी करणे योग्य नसल्याचे पालकमंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thailand Pub Fire : पबमध्ये मध्यरात्री भीषण अग्नितांडव, २७ जणांचा होरपळून मृत्यू, ६३ गंभीर जखमी; दुर्घटनेचा थरारक व्हिडिओ समोर

Constitutional Amendment India: मंत्रिपदावरून हटविण्याऐवजी निलंबन;प्रस्तावित १३०व्या घटनादुरुस्ती विधेयकाबाबत संसदीय समितीची शिफारस

शेतकऱ्यांना ३१ जुलैपूर्वी कर्जमाफी! ३ टप्प्यात कर्जमाफी, १५ लाख शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा होणार; पहिल्यांदा कर्जमाफी कोणाला? निकष काय बदलले, वाचा सविस्तर...

अर्थवेध : भारतीय गुंतवणूकदारांचा विजय; ‘एफआयआय’ युगाचा अस्त?

ढिंग टांग : वैशाखनंदन संवाद..!

SCROLL FOR NEXT