mla prakash abitkar press conference in kolhapur 
कोल्हापूर

चंद्रकांतदादा कोरोनातही राजकारण करू नका ; प्रकाश आबिटकरांनी मारला असा टोला...

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : कोरोनाच्या भीषण संकटात मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील महाविकास आघाडी सरकार कौतुकास्पद कामगिरी करीत आहे. शिवसेनेचे आमदार, खासदार जीवावर उदार होऊन, प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन परिस्थितीचा आढावा घेत आहेत, काम करीत आहेत. परंतू चंद्रकांतदादा पाटील व नेते मात्र नुसतीच टीका करून राजकारण करीत आहेत. चांगल्या कामाला चांगले म्हणायची दानत विरोधकांनी ठेवली पाहिजे, आणि अशा कठीण प्रसंगात तरी राजकारण करू नये असा सल्ला आमदार प्रकाश आबिटकर यांनी चंद्रकांतदादा पाटील यांना पत्रकारांशी बोलताना दिला.


  यावेळी बोलताना आमदार आबिटकर म्हणाले, सध्याचा काळ कठीण आहे. वैश्विक महामारी असलेल्या कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी एकजुटीची आवश्यकता आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे संपुर्ण देशासह महाराष्ट्रामध्ये नाजूक स्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थीतीचा सामना करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे व महाविकास आघाडीच्या नेतेमंडळींच्या नेतृत्वाखाली सुक्ष्म नियोजन सुरू असून हिंदूह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीनुसार त्यांचे कार्य सुरू आहे. देशासह राज्यात कोरोना संसर्ग वाढत असताना संकटाच्या काळात सरकारच्या खांद्याला खांदा लावून विरोधी पक्षाने लढण्याची गरज असते. मात्र विरोधी पक्षाकडून दररोज एक-एक टिका करून संकटाच्या काळातही राजकारण करून आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने सर्वांना सोबत घेऊन कोरोनाशी युद्ध लढत आहे. हे देशात कधीही घडताना दिसले नाही. आज राज्यात एकसंध राहून आणि राजकीय मतभेद विसरुन काम करण्याची आवश्यकता आहे. राज्यात लोकनियुक्त सरकार असताना भाजपाकडून वारंवार राज्यपालांकडे जाऊन महाराष्ट्र विकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहेत. कोरोनाच्या प्रसारामुळे लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला. उद्योगधंदे बंद झाले. कामे ठप्प झाली. रोजगाराचे संकट निर्माण झाले. आरोग्य व्यवस्थेवरील ताण प्रचंड वाढला.

अशा परिस्थितीत लोकांना धीर देणे, सरकारी मदत योग्य लोकांपर्यंत पोहोचते आहे की नाही यावर लक्ष ठेवणे, प्रशासनाशी संवाद साधणे आणि रोगाचा प्रसार होऊ नये याची काळजी घेतानाच जनतेच्या भावनांचा उद्रेक होऊ नये आणि स्वतःला कोणतीही आरोग्य विषयक समस्या निर्माण होऊ नये याची खबरदारी घेणे आवश्यक होते. ही सारी आव्हाने शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींनी यशस्वीपणे पेलली आहेत. मात्र राज्यावर संकट असतानाही भाजपाला राजकारणाशिवाय काही सूचत नाही. भाजपाने वारंवार  राज्यपालांना सरकारविरोधात निवेदन देऊन राजकारण करण्यापेक्षा राज्याला केंद्राकडून आर्थिक मदत मिळण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन आमदार प्रकाश आबिटकर यांनी चंद्रकांतदादा पाटील यांना केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAK vs UAE: what a throw! पाकिस्तानी खेळाडूने अम्पायरला चेंडू फेकून मारला, वसीम अक्रमने केलं कौतुक! सोशल मीडियावर ट्रोल

Kharadi Traffic : खराडी-हडपसर रस्त्यावर बेशिस्त पार्किंग, वाहतूक कोंडी व अपघाताची शक्यता; नागरिकांची कारवाईची मागणी

Handshake Controversy Timeline : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची टप्प्याटप्प्याने कशी नाचक्की होत गेली ते वाचा... Andy Pycroft प्रकरण त्यांच्यावरच कसं उलटलं?

Latest Maharashtra News Updates : लासलगावमध्ये एकतर्फी प्रेमाच्या संशयातून तरुणावर कोयत्याने हल्ला...

Family Travel Tips: फॅमिलीसोबत प्रवासात निघालात? डिहायड्रेशनपासून बचावासाठी ही फळं सोबत ठेवा!

SCROLL FOR NEXT