sharad pawar dhananjay munde.png 
कोल्हापूर

धनंजय मुंडे प्रकरणात आमचा निष्कर्ष बरोबर होता- शरद पवार

सकाळ ऑनलाइन टीम

कोल्हापूर- सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधातील बलात्काराची तक्रार रेणू शर्मा या महिलेने मागे घेतली आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. धनंजय मुंडे यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांची चौकशी व्हावी हा आमचा निष्कर्ष बरोबर होता, असे त्यांनी म्हटले आहे. मुंडे यांच्यावर झालेले आरोप गंभीर होते. मात्र, त्यातील सत्यता पडताळून पाहण्याची गरज असल्याचे मला वाटत होते, असेही ते म्हणाले. 

ते पुढे म्हणाले की, सत्यता पाहिल्याशिवाय निष्कर्षापर्यंत येऊ नये. मी सुरुवातीला हा गंभीर प्रश्न असल्याचे म्हटले होते. त्यानंतर मी याप्रकरणातील कागदपत्रे पाहिली. अनेक जणांनी या महिलेविरोधात तक्रारी केल्या. आता त्या महिलेने तक्रार मागे घेतल्याचे समजते. त्यामुळे आम्ही या प्रकरणात चौकशी करावी हा आमचा निष्कर्ष बरोबर होता. चौकशी आणि तपास यंत्रणांना त्यांचे काम करुद्यात, असेही पवार यावेळी म्हणाले. 

यावेळी नेत्यांची सुरक्षा कमी करण्यावरुन झालेल्या वादावर आणि केंद्र सरकारकडून होत असलेल्या हस्तक्षेपावर त्यांनी मत व्यक्त केले. ते म्हणाले की, कायदा व सुव्यवस्था हा राज्याचा प्रश्न आहे. केंद्र सरकारने या अधिकारात हस्तक्षेप करु नयेत. पण ते काहीही करु शकतात. त्यांच्या हस्तक्षेपाचे मला आश्चर्य वाटते. सुरक्षेचा अभ्यास वरिष्ठ अधिकारी करतात. त्यांनी सुचवल्यानुसार सुरक्षा कमी करण्यात आली आहे. सुरक्षा व्यवस्था देण्याचा निर्णय गृहखाते घेते. त्यात कोणीही हस्तक्षेप करत नाही. परंतु, काही लोकांना हे सर्व बरोबर घेऊन जायला आनंद वाटत असतो. मी माझी सुरक्षा कमी करण्याची विनंती केलेली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘या’ शेतकऱ्यांना नाही कर्जमाफीचा लाभ! ३० सप्टेंबर २०२५ पूर्वीचे थकबाकीदार शेतकऱ्यांनाच दोन लाखांची पीक कर्जमाफी, वाचा...

महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२६-२७ जाहीर! राज्यात काय स्वस्त झालं, कोणत्या गोष्टी महागल्या? संपूर्ण यादी जाणून घ्या...

Iran-Israel War: दुबईकडे केवळ १० दिवस पुरेल एवढाच अन्नसाठा; फळही नाहीत अन् भाज्यांचाही तुटवडा

Pune News: ''पुण्यातील बाजारपेठ शहराबाहेर स्थलांतरित...'', केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं मोठं विधान

Baramati News : बारामती तालुक्याला वरदान ठरणाऱ्या नीरा कऱ्हा उपसा सिंचन योजनेला राज्य शासनाची मान्यता....

SCROLL FOR NEXT