sharad pawar dhananjay munde.png 
कोल्हापूर

धनंजय मुंडे प्रकरणात आमचा निष्कर्ष बरोबर होता- शरद पवार

सकाळ ऑनलाइन टीम

कोल्हापूर- सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधातील बलात्काराची तक्रार रेणू शर्मा या महिलेने मागे घेतली आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. धनंजय मुंडे यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांची चौकशी व्हावी हा आमचा निष्कर्ष बरोबर होता, असे त्यांनी म्हटले आहे. मुंडे यांच्यावर झालेले आरोप गंभीर होते. मात्र, त्यातील सत्यता पडताळून पाहण्याची गरज असल्याचे मला वाटत होते, असेही ते म्हणाले. 

ते पुढे म्हणाले की, सत्यता पाहिल्याशिवाय निष्कर्षापर्यंत येऊ नये. मी सुरुवातीला हा गंभीर प्रश्न असल्याचे म्हटले होते. त्यानंतर मी याप्रकरणातील कागदपत्रे पाहिली. अनेक जणांनी या महिलेविरोधात तक्रारी केल्या. आता त्या महिलेने तक्रार मागे घेतल्याचे समजते. त्यामुळे आम्ही या प्रकरणात चौकशी करावी हा आमचा निष्कर्ष बरोबर होता. चौकशी आणि तपास यंत्रणांना त्यांचे काम करुद्यात, असेही पवार यावेळी म्हणाले. 

यावेळी नेत्यांची सुरक्षा कमी करण्यावरुन झालेल्या वादावर आणि केंद्र सरकारकडून होत असलेल्या हस्तक्षेपावर त्यांनी मत व्यक्त केले. ते म्हणाले की, कायदा व सुव्यवस्था हा राज्याचा प्रश्न आहे. केंद्र सरकारने या अधिकारात हस्तक्षेप करु नयेत. पण ते काहीही करु शकतात. त्यांच्या हस्तक्षेपाचे मला आश्चर्य वाटते. सुरक्षेचा अभ्यास वरिष्ठ अधिकारी करतात. त्यांनी सुचवल्यानुसार सुरक्षा कमी करण्यात आली आहे. सुरक्षा व्यवस्था देण्याचा निर्णय गृहखाते घेते. त्यात कोणीही हस्तक्षेप करत नाही. परंतु, काही लोकांना हे सर्व बरोबर घेऊन जायला आनंद वाटत असतो. मी माझी सुरक्षा कमी करण्याची विनंती केलेली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : आज काँग्रेस करणार महात्मा गांधीच्या पुतळ्याचे रक्षण

Lottery Scam : लॉटरीच्या नावाखाली दाम्पत्याने 600 लोकांना 40 कोटींचा घातला गंडा; लोकांनी 5 ते 10 लाखांपर्यंत केली होती गुंतवणूक

Maharashtra Rain Update News : राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस, पुढील पाच दिवस महत्वाचे; ११ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

IT Park:'जमीन पसंत पडेना, आयटी पार्क होईना'; प्रशासनाचा कागदी खेळ, कृषि महाविद्यालयला पर्यायी प्रस्ताव मान्य नाही

Indian Railways: मिनिटाला निघणार दीड लाख तिकिटे; रेल्वे प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय,आरक्षण केंद्रातील यंत्रणेत बदल

SCROLL FOR NEXT