Samarjit Ghatge vs Hasan Mushrif  esakal
कोल्हापूर

'100 वर्षांपूर्वी शाहू महाराजांनी दलितांना दिलेली जमीन समरजित घाटगेंनी काढून घेतली'; मुश्रीफांचा गंभीर आरोप

Samarjit Ghatge vs Hasan Mushrif : 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान हे सर्वसामान्यांसाठी आहे. प्रत्येकाला एकाच मताचा अधिकार संविधानामुळे मिळाला आहे.'

सकाळ डिजिटल टीम

सिद्धनेर्ली (ता. कागल) येथील दलित समाजाला शंभर वर्षांपूर्वी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी दिलेली जमीन समरजित घाटगे यांनी काढून घेतली आहे.

म्हाकवे : ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांनी भारतीय राज्यघटनेची फार मोठी देणगी देशाला दिली आहे. त्यामुळे चंद्र-सूर्य असेपर्यंत संविधान अबाधित राहील,’ असे प्रतिपादन पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी केले.

बाचणी (ता. कागल) येथे आयोजित संविधान सन्मान परिषदेत (Constitution Sanman Parishad) ते बोलत होते. अध्यक्षस्थानी गंगाराम कांबळे यांचे नातू राजेंद्र कांबळे होते. त्यांच्या हस्ते परिषदेचे उद्‌घाटन झाले. तर, बामणी येथील बौद्धविहार व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सांस्कृतिक सभागृहाचे लोकार्पण मुश्रीफ यांच्या हस्ते झाले.

मुश्रीफ म्हणाले, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान हे सर्वसामान्यांसाठी आहे. प्रत्येकाला एकाच मताचा अधिकार संविधानामुळे मिळाला आहे. त्यामुळेच माझ्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता आमदार आणि मंत्री झाला.’ माजी आमदार संजय घाटगे म्हणाले, ‘कसलाही आणि कोणताही प्रसंग येऊ दे, कधीही कुणापुढेही झुकू नका. अलीकडच्या काळात चांगल्या कामात खोडा घालणाऱ्या काही दुष्ट प्रवृत्ती डोके वर काढत आहेत. अशा प्रवृत्तींना तिथेच ठेचा.’

स्वागत भिकाजी सरदेसाई यांनी केले. यावेळी विजय काळे यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, मनोज फराकटे, ‘बिद्री’चे संचालक रवींद्र पाटील, सुनीलराज सूर्यवंशी, सूर्यकांत पाटील, दिनकर कोतेकर, दलितमित्र बळवंतराव माने, संजय हेगडे, सुनील खामकर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन तेजस्विनी पांचाळ यांनी केले. आभार सूर्यकांत पाटील यांनी मानले.

त्यांना जमिनी विकत घेऊन देऊ..

सिद्धनेर्ली (ता. कागल) येथील दलित समाजाला शंभर वर्षांपूर्वी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी दिलेली जमीन समरजित घाटगे यांनी काढून घेतली आहे. याचा संदर्भ वक्त्यांनी भाषणात घेतला. हा धागा पकडत मंत्री मुश्रीफ म्हणाले, ‘सिद्धनेर्ली येथील अन्यायग्रस्त दलित समाजाच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा आहे. त्यांच्या जमिनी त्यांना परत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करूच. प्रसंगी, दुसरी जमीन विकत घेऊन त्यांना जमिनी देऊ.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT