Shivaji University Faculty Change Comforts Students kolhapur
Shivaji University Faculty Change Comforts Students kolhapur 
कोल्हापूर

शिवाजी विद्यापीठाच्या फॅकल्टी चेंज विद्यार्थ्यांना दिलासा....

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर - फॅकल्टी चेंज करून एमएची नियमित सेमिस्टर एकची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल अखेर जाहीर झाला आहे. त्यांचा सेमिस्टर दोन परीक्षेला बसण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या विद्यार्थ्यांना अपात्र ठरविल्याने त्यांचा निकाल राखून ठेवला होता. या विषयासंदर्भात ‘सकाळ’मध्ये‘फॅकल्टी चेंजमुळे जीव टांगणीला’ या शीर्षकाखाली वृत्त प्रसिद्ध झाले होते.

दुसऱ्या सेमिस्टरचा मार्ग मोकळा; समितीने ठरविले पात्र

शिवाजी विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील सुमारे ४० विद्यार्थ्यांना अपात्र ठरविल्याने त्यांच्यात अस्वस्थता पसरली होती. प्रशासनाने त्याची दखल घेत त्रिसदस्यीय समिती नेमली होती. या समितीने बैठक घेऊन विद्यार्थ्यांना पात्र ठरवावे, अशी शिफारस विद्या परिषदेकडे केली. तसेच त्यांना सेमिस्टर दोन परीक्षेला बसण्याची परवानगी दिली. असे असताना त्यांचे निकाल जाहीर झालेले नव्हते. ते आता जाहीर झाले आहेत. विद्यार्थी परीक्षा अर्ज भरण्याच्या तयारीला लागले आहेत. समितीने विद्या परिषदेकडे शिफारस केली असली तरी विद्या परिषदेत होणाऱ्या निर्णयानुसार पुढील कार्यवाही केली जाणार आहे. येत्या महिन्याभरात विद्या परिषदेची बैठक होणार असून, त्यात काय निर्णय होणार याकडेही विद्यार्थ्यांचे 
लक्ष आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Insurance: मोदी सरकार आरोग्य विम्यावरील जीएसटी कमी करण्याच्या तयारीत; ग्राहकांना होणार थेट फायदा

Jonty Rhodes IPL 2024 : बॉल बॉयचा भन्नाट कॅच... टिप्स देणाऱ्या जाँटीने थोपटली पाठ; Video व्हायरल

Jharkhand ED Raid : 15 हजार पगार, 10 हजार लाच.. अन् घरात सापडले 30 कोटी; नोकराच्या घरातली कॅश कुणाची? 'या' मंत्र्यांचं कनेक्शन?

Latest Marathi News Update : गडचिरोलीत CRPF चे सर्च ऑपरेशन, मिळाले विस्फोटकांनी भरलेले सहा प्रेशर कुकर

Health Care : वाढत्या तापमानामुळे शरीरातील उष्णतेत होतेय वाढ, मूळव्याध अन् अ‍ॅसिडिटीसारखे आजार बळावण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT