कोल्हापूर

उचगांव सेवा मार्गावरील खड्डे भरण्याची मागणी

CD

86287
उचगाव (ता. करवीर) : राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे सहाय्यक अभियंता चंद्रकांत भरडे यांना निवेदन देताना राजू यादव, पोपट दांगट, अवधूत साळोखे, दीपक रेडेकर आदींसह शिवसैनिक.

उचगांव सेवा मार्गावरील खड्डे भरण्याची मागणी
गांधीनगर, ता. २८ : उचगाव (ता. करवीर) येथील सेवा मार्ग आणि महामार्ग पुलाखालील रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी; अन्यथा रास्ता रोको करू, असा इशारा शिवसेना करवीर तालुका प्रमुख (उद्धव बाळासाहेब ठाकरे) राजू यादव यांनी दिला.
निवेदनात म्हटले आहे, उचगांव महामार्ग पुलाखाली आणि सेवा मार्गावर मोठ खड्डे पडले असून येथे रस्ता अत्यंत खराब झाला आहे. सरनोबतवाडी तसेच हॉटेल सूर्यदीपच्या मार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजूला सेवामार्ग नसल्याने वाहनधारक उलट्या मार्गाने आपला जीव मुठीत धरून प्रवास करतात याबाबत कार्यवाही व्हावी. महामार्गाला लागून असणाऱ्या गटारींमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा अडकला असून, तो तत्काळ स्वच्छ करावा; अन्यथा अधिकाऱ्यांना याचा जाब विचारून रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल.
मागणीचे निवेदन करवीर शिवसेनेतर्फे राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे सहाय्यक अभियंता चंद्रकांत भरडे यांना दिले. या वेळी करवीर तालुकाप्रमुख राजू यादव, उपजिल्हाप्रमुख पोपट दांगट, उपजिल्हाप्रमुख अवधूत साळोखे, कामगार सेनेचे जिल्हाप्रमुख राजू सांगावकर, दीपक रेडेकर, राहुल गिरूले, संतोष चौगुले, बाळासाहेब नलवडे, दत्तात्रय विभूते, प्रफुल्ल घोरपडे आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chitra Wagh: ठाकरे गटाच्या जाहिरातीमध्ये पॉर्नस्टारचा वापर? चित्रा वाघ यांनी फोटो दाखवत केले गंभीर आरोप

Mahesh Manjrekar : स्वातंत्र्य वीर सावरकर, रणदीपचा हस्तक्षेप आणि मतभेद ; मांजरेकरांनी अखेर सोडलं मौन

Zimbabwe: झिम्बाब्वेने तयार केलं नवं चलन; पण सरकारी खात्यांमध्येच चालेनात नोटा, जनताही नाराज, काय आहे कारण?

T20 World Cup Team India : टी-20 वर्ल्ड कपचे शेर IPL मध्ये ढेर, संघात स्थान मिळताच 'हे' 6 भारतीय खेळाडू ठरलं फ्लॉप

Tech Layoffs : यंदाचं वर्ष ठरतंय 'लेऑफ'चं.. एप्रिलपर्यंत टॉप टेक कंपन्यांनी 70,000 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना पाठवलं घरी!

SCROLL FOR NEXT