कोल्हापूर

आमदार प्रकाश आबिटकर लक्षवेधी

CD

सहकारी पतसंस्थांसाठी तज्ज्ञ समिती

आमदार प्रकाश आबिटकर ः विधानसभेत लक्षवेधी सूचनेनंतर घोषणा

कोल्हापूर, ता. ३ ः राज्यातील पतसंस्थांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत लवकरच तज्ज्ञांची समिती गठीत केली जाणार आहे. याबाबत विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडल्यानंतर सहकारमंत्री अतुल सावे यांनी याबाबतची घोषणा केल्याची माहिती आमदार प्रकाश आबिटकर यांनी दिली.
राज्यात खासगी सावकारी, तसेच मायक्रो फायनान्सच्या नावाखाली सर्वसामान्यांची आर्थिक लूट होत आहे. ती थांबविण्यासाठी पतसंस्थांची चळवळ सक्षम करणे आवश्यक असल्याचे आमदार आबिटकर यांनी सांगितले. शासनाची कोणतीही आर्थिक मदत न घेता ९० हजार कोटी रुपयांच्या ठेवी पतसंस्थांकडे असून शासनाच्या नियमानुसार या सर्व संस्था कार्यरत आहेत. सध्या ९० हजार कोटीवरून २५ लाख कोटी रुपयांपर्यंत ठेवींची संख्या वाढेल, एवढी क्षमता या चळवळीमध्ये आहे. त्यामुळे ‘ब’ वर्ग संस्थांना ठेवी व कर्ज घेण्यासाठी परवानगी देणे, ठेवींना विमा संरक्षण देणे गरजेचे असल्याचेही आमदार आबिटकर यांनी सांगितले.
सद्यस्थितीत राज्यात तेरा हजार ४१२ नागरी व ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था आणि सहा हजार ५३६ कर्मचारी सहकारी पतसंस्था अशा एकूण १९ हजार ९४८ सहकारी पतसंस्था कार्यरत आहेत. या पतसंस्थांमध्ये तीन कोटींहून अधिक ठेवीदारांच्या ९० हजार ५०१ कोटी इतक्या रकमेच्या ठेवी आहेत. त्यामुळे पंधरा दिवसांत तज्ज्ञ समिती गठीत केली जाईल, असे मंत्री श्री. सावे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chitra Wagh: ठाकरे गटाच्या जाहिरातीमध्ये पॉर्नस्टारचा वापर? चित्रा वाघ यांनी फोटो दाखवत केले गंभीर आरोप

Mahesh Manjrekar : स्वातंत्र्य वीर सावरकर, रणदीपचा हस्तक्षेप आणि मतभेद ; मांजरेकरांनी अखेर सोडलं मौन

Zimbabwe: झिम्बाब्वेने तयार केलं नवं चलन; पण सरकारी खात्यांमध्येच चालेनात नोटा, जनताही नाराज, काय आहे कारण?

T20 World Cup Team India: टी-20 वर्ल्ड कपचे शेर IPL मध्ये ढेर, संघात स्थान मिळताच 'हे' 6 भारतीय खेळाडू ठरलं फ्लॉप

Tech Layoffs : यंदाचं वर्ष ठरतंय 'लेऑफ'चं.. एप्रिलपर्यंत टॉप टेक कंपन्यांनी 70,000 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना पाठवलं घरी!

SCROLL FOR NEXT