कोल्हापूर

चिन्मय मिशन व्याख्यानमाला

CD

योगीजनांचे प्राणायामाद्वारे
मनावर नियंत्रण
स्वामी अद्वैतानंद; चिन्मय व्याख्यानमाला
कोल्हापूर, ता. २२ : ‘‘योगी लोक प्राणायामाद्वारे मनाचे नियंत्रण करतात. भोगी लोक फक्त अन्नग्रहण करतात. मनोमय कोशामध्ये भावना आहेत. श्रद्धा, प्रेम, वात्सल्य, करुणा असे भाव आहेत. त्यासाठी ध्यानमयकोश सदैव जागृत ठेवला पाहिजे. तत्त्वज्ञानी, संशोधक त्याचा वापर करतात,’’ असे प्रतिपादन स्वामी अद्वैतानंद यांनी केले. शाहू स्मारक भवनामध्ये चिन्मय मिशन संस्थेतर्फे सुरू असलेल्या व्याख्यानमालेत ते बोलत होते.
स्वामी अद्वैतानंद म्हणाले, ‘‘स्वप्न अवस्था आहे. स्वप्न असं पाहिलं, तसं पाहिलं असे आपण म्हणतो. गाढ झोपेच्या अवस्थेत स्वप्न पाहिले असते. अशीही अवस्था असते. या अवस्थेत चिंता, काळजी नसते. ताणतणाव नसतो. त्यामुळे जिथे संधी मिळेल, तिथे लोक झोपून घेतात. प्रवासामध्ये पुस्तक वाचताना आणि एकांतात झोपण्याची सवय अनेकांना असते. ही अवस्था चक्राप्रमाणे असते. आध्यात्मिक लोक या अवस्थेपेक्षा वेगळी अनुभूती घेत असतात. शुद्ध, आचार-विचार एकांतात चिंतन करू शकतो. त्याचा सुखद अनुभवही येतो.’’
ते म्हणाले, ‘‘आपल्या व्यक्तिमत्त्वांमध्ये पाच कोष आहेत. यात एकांत किंवा निद्रावस्था हा कोश बहुतेकांना मनशांती आणि शरीरशांतीची अनुभूती देतो. अन्नमयकोश, प्राणमयकोश असे दोन प्रकार जास्त प्रचलित आहेत. यात अन्नमयकोश म्हणजे, शरीर हे अन्नाने भरलेले आहे. त्यामुळे आपण सात्विक आहार किती घेतो त्याचा परिणाम आपल्या शरीरावर आणि पर्यायाने मनावरही होत असतो. म्हणून सात्त्विक आहारालासुद्धा महत्त्व आहे. अन्नग्रहण करताना मनाची अवस्था काय असते यालाही महत्त्व आहे. त्यामुळे शांतचित्ताने अन्नग्रहण केल्यास मनशांतीसाठी लाभ होऊ शकतो. शुद्ध हवा शोषून घेणे, सात्त्विक आहार घेणे आणि शुद्ध विचार-आचार करणे हे प्राणाचे कार्य आहे. हे जितके शुद्ध घ्याल, तितके नित्य जीवनात समाधान, शांततापूर्ण जगण्याचा मार्ग अवलंब करता येणे शक्य आहे. जे लोक योगी असतात, ते प्राणायाम वगैरे करतात. त्याआधारे मनाचे नियंत्रण करतात. तोच प्रकार नित्य आयुष्यात अंगीकारला तर जगण्याची वाट सुसह्य होऊ शकते.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Meenatai Thackeray: कोण होत्या मीनाताई ठाकरे? बाळासाहेबांच्या झंजावात राजकारणात होता सिंहाचा वाटा

Nagpur Municipal Corporation: 'नागपूर मनपा निवडणुकीला महागाईचा फटका'; २० कोटींचा अंदाजित खर्च, २४ लाखांहून अधिक मतदार

Nano Banana AI Durga Puja 2025 Saree Look Prompts: 'हे' 5 प्रॉम्प्ट कॉपी करा अन् जनरेट करा फेस्टिव्हल साडी लूक

Bhosari MIDC : भोसरी एमआयडीसी पोलिसांचा पर्यावरणासाठी पुढाकार, देशी वृक्षांची लागवड

Mumbai Local Viral Video: दिव्यांगजन कोचमध्ये सामान्य प्रवाशांची घुसखोरी, आरक्षित डब्ब्यात चढण्यासाठी दृष्टिहीनांचे हाल

SCROLL FOR NEXT