कोल्हापूर

इचलकरंजीत जलतरणातून ‘बेटी बचाओ’ चा संदेश

CD

ich307.jpg
19988
इचलकरंजी ः पंचगंगा नदीतून रुई ते इचलकरंजी अंतर पोहण्याचा उपक्रम राबवला. यावेळी बेटी बचाओचा संदेशही देण्यात आला.

इचलकरंजीत जलतरणातून ‘बेटी बचाओ’चा संदेश
इचलकरंजी, ता. ३१ ः पंचगंगा जलतरण मंडळाच्या सदस्यांनी रुई ते इचलकरंजी असे १८ किमीचे अंतर पोहून पूर्ण केले. त्यांनी एक तास ४५ मिनिटात हे अंतर पूर्ण केले. उपक्रमकातून बेटी बचाओ अभियानाचा संदेश दिला.
पट्टीचे पोहणाऱ्या ४० जलतरणपटूंनी सहभाग नोंदवला. पंचगंगा नदीपात्रात मंडळाचे सदस्य दररोज न चुकता जलतरणचा आनंद घेतात. तसेच याबाबतचे फायदेही अन्य नागरिकांना सांगत असतात. त्यामुळे पोहणाऱ्यांची संख्या वाढत आहे. सध्या दररोज सकाळी ६ ते ९ या वेळेत न चुकता सुमारे १५० जण नदीपात्रात पोहण्याचा आनंद घेत असतात. याशिवाय मंडळाच्या माध्यमातून हे सर्वजण पुरात महादेव मंदिरासह परिसराची नेहमीच स्वच्छता करीत असतात. सध्या नदीला पूर आला असून, यातून रुई ते इचलकरंजी असे १८ किमी अंतर जलतरण करीत पूर्ण करण्याचा निर्धार केला. त्यानुसार निर्धारित वेळेत हे अंतर पूर्ण करीत असताना बेटी बचाओच्या घोषणाही दिल्या. उपक्रमात मिलिंद पवार, विठ्ठल येसाटे, अमोल माने आदी सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain: पुढील तीन दिवस महत्त्वाचे! मुसळधारेसह भरतीचा इशारा; हवामान विभागाचा 'या' जिल्ह्यांना अलर्ट

Vanjari Reservation: मराठा आरक्षणासारखा वंजारी समाजाचा प्रश्न सुटणार का? ST मध्ये असल्याचा महत्त्वाचा पुरावा सापडला

Kolhapur Attack : विद्यार्थ्यांनी गजबजलेल्या कोल्हापुरातील सायबर चौकात प्राणघातक हल्ला,पार्टीच्या वादातून मित्रांमध्ये वाद

MLA Rohit Pawar: सर्वसामान्यांना त्रास दिल्यास गय नाही: आमदार रोहित पवार; आपण जनसेवक आहोत विसरु नका, तीन हजार परत करायला लावले

Dermatitis Spread: 'साेलापूर शहरात टिनिया, कॅन्डिडासह त्वचेच्या विकारांत होतेय वाढ'; शहरात अतिवृष्टी, घाण पाणी अन् ओलाव्याचा परिणाम

SCROLL FOR NEXT