कोल्हापूर

निट्टूर तलावाची पाणी पातळी घटली

CD

B01089
कोवाड ः निट्टूर येथील तलावातील पाणीसाठा.
--------
निट्टूर तलावाची पाणी पातळी घटली
शेतकऱ्यांची घालमेल; उपशावर पाटबंधारे विभागाने नियंत्रण आणण्याची गरज
अशोक पाटील ः सकाळ वृत्तसेवा
कोवाड, ता. ९ः निट्टूर (ता. चंदगड) येथील पाझर तलाव क्रमांक दोनमधील पाण्याची पातळी कमी झाली आहे. जूनपर्यंत पाणी पुरेल की नाही याची खात्री नसल्याने शेतकऱ्यांची घालमेल सुरु झाली आहे.
पाटबंधारे विभागाने तलावातील पाणी उपशाला दिलेली अतिरिक्त मंजूरी तलावाच्या पाणी साठ्यावर परिणाम करत असल्याचे शेतकऱ्यांतून बोलले जाते. त्यामुळे मार्चमध्येच तलावातील पाण्याची पातळी कमी होत असल्याने त्यावर पाटबंधारे विभागाने नियंत्रण आणाण्याची गरज आहे. सध्या कडाक्याचे उन असल्याने पाण्याचे बाष्पीभवन होत आहे. तसेच पाणी उपशामुळे पाणीसाठ्यात घट झाल्याचे दिसते. पाटबंधारे विभागाने तलावातील उपलब्ध पाणीसाठा व उपशावर नियंत्रण आणल्यास मे अखेरपर्यंत शेतीला पाणी पुरवठा होऊ शकतो. अन्यथा शेतीच्या पाण्याचा प्रश्न गहन होण्याची शक्यता आहे.
दरवर्षी एप्रिलपासून येथील लाभार्थी शेतकऱ्यांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. यावर्षीही तिच परिस्थिती निर्माण होणार असल्याचे दिसत असल्याने लाभार्थी शेतकऱ्यांची धाकधूक वाढली आहे. पाणी परवाना आणि पाणी उपसा यांची पाहणी होण्याची गरज आहे. तलावातील सरासरी पाणी साठा विचारात न घेता पाटबंधारे विभागाने अतिरिक्त पाणी उपशाला मंजूरी दिल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. तसेच पाणी उपशावर नियंत्रणही नसल्याने दरवर्षी तलावाच्या लाभक्षेत्रातील शेतीला पाण्याची टंचाई भासते. यावर्षी मार्चमध्ये तलावाची पाणी पातळी कमालीची घटली आहे. त्यामुळे जूनपर्यंत पाणी पुरेल याची शाश्वती दिसत नाही. पाण्याचा दुसरा पर्याय नसल्याने येथील शेतकऱ्यांची धाकधूक वाढली आहे. तलावातील पाण्याच्या आधारावर निट्टूर, दुंडगे, कोवाड, तेऊरवाडी येथील शेतकऱ्यांनी खडकाळ जमिनीत लाखो रुपये खर्च करुन जमिनी लागवडीखाली आणल्या आहेत. कोरडवाहू जमीन असल्याने दर आठ दिवसाला येथील पिकाला पाणी लागते. ऊसाचे क्षेत्र जास्त येथील शेतकऱ्यांचे तलावातील पाण्याच्या साठ्याकडे लक्ष लागले आहे. पाटबंधारे विभागाने अतिरिक्त पाणी उपशावर मर्यादा आणावी अशी शेतकऱ्यांतून मागणी होत आहे.
---------------------------------------
‘पाटबंधारे’ने नियोजन करण्याची गरज
तलावाच्या पाण्यावर अनेक शेतकऱ्यांनी डोंगरावर शेती केली आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाने पावसाळा सुरु होईपर्यंत तलावातील पाणी लाभार्थी शेतकऱ्यांना कसे पुरेल याचे नियोजन करण्याची गरज आहे.
-------------
तलावाची पाण्याची क्षमता १५४ दशलक्ष घनफुट आहे. आतापर्यंत ५५ दशलक्ष घनफुट पाणीसाठा उपलब्ध आहे. म्हणजेच ३६ टक्के पाणी आहे. तलावात किमान पाणी साठा ठेवून उर्वरित दोन महिने पाणी देण्याचे नियोजन केले आहे. अतिरिक्त पाणी उपसा कुठेही नाही. दरवर्षीप्रमाणे पाणी उपसा सुरु आहे.
-डी. आर. धोंडफोडे, शाखा अभियंता, पाटबंधारे विभाग चंदगड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gujarat Farmers Protest : गुजरातमध्ये शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण; ४७ जणांना अटक, १००० हून अधिक आंदोलकांविरुद्ध गुन्हे दाखल

Shravan 2025 Food Avoid: श्रावणात नॉन व्हेज टाळताय? मग प्रथिनांची कमतरता भरून काढण्यासाठी 'या' 5 शाकाहारी पदार्थांचा करा आहारात समावेश

Latest Maharashtra News Updates : आळंदीत रविवारी संत भेटीचा सोहळा, वारकरी संप्रदायाला अनुभवायला मिळणार दुग्धशर्करा योग

Mumbai Crime : मोबाईलवर गेम खेळताना पाहून संतापला पिता, चार वर्षांच्या चिमुकलीची गळा दाबून हत्या अन्...

Pune News : देशी गोवंश संवर्धन हे ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचे : सहकारमंत्री बाबासाहेब पाटील

SCROLL FOR NEXT