Koyna Dam
Koyna Dam esakal
पश्चिम महाराष्ट्र

Koyna Dam : 1967 च्या भूकंपात कोयना धरणाला विशेष धोका का झाला नाही? काय आहे कारण?

सकाळ डिजिटल टीम

१९६७ च्या भूकंपात कोयना धरणाला विशेष धोका न निर्माण होण्यामागे गुणवत्ता सनियंत्रण आणि संशोधन विभागाचे परिश्रम आहेत.

चिपळूण : महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोयना जलविद्युत प्रकल्पात (Koyna Hydroelectric Project) आपल्या कार्यकाळात अधिकारी अभियंता म्हणून कोयना प्रकल्पाच्या मुख्य अभियंता पदासह विविध पदांवर सेवा बजावलेल्या मान्यवर निवृत्त अभियंत्यांच्या उपस्थितीत कोथरूड-पुणे येथे अलोरे शाळेच्या ‘स्मृतिशलाका’ स्मरणिकेचे नुकतेच लोकार्पण झाले.

या प्रसंगी कोयना धरण (Koyna Dam) उभारणीपासून महत्त्वाची कामगिरी बजावणारे अभियंता (Engineer) एकत्र आले अन् त्यांनी धरणासंबंधित आणि तत्कालीन लोकजीवनासंबंधी आठवणींना उजाळा दिला. १९६७ च्या भूकंपात कोयना धरणाला विशेष धोका का झाला नाही? यापासून अलोरे शाळा उभारणीपर्यंतच्या नोंदी करणारी मालिका आजपासून...

सिमेंट हे एक केमिकल आहे. त्यात पाणी किती मिक्स करायचे याचे प्रमाण ठरलेले आहे. सिमेंट काँक्रिटमधील आकुंचन (तडे जाणे) आणि प्रसरण पावण्याच्या प्रक्रियेमुळे भविष्यात अडचण येऊ नये म्हणून कोयना प्रकल्पात सिमेंट काँक्रिटचे ग्रेडेशन/मिक्स डिझाईन स्वतंत्र अभ्यास करून ठरवण्यात आले होते, अशी महत्त्वाची माहिती महाराष्ट्र शासनाच्या पाटबंधारे खात्याचे सचिव म्हणून सेवानिवृत्त झालेले श्रीधर ए. भेलके यांनी दिली.

कोयनेच्या आठवणी जागवताना भेलके म्हणाले, १९६७ च्या भूकंपात कोयना धरणाला विशेष धोका न निर्माण होण्यामागे गुणवत्ता सनियंत्रण आणि संशोधन विभागाचे परिश्रम आहेत. प्रत्यक्ष काँक्रिटचे काम करताना तापमानवाढ होऊ नये म्हणून बर्फ वापरला गेला होता. त्यासाठी बॅचिंग प्लांटची व्यवस्था करण्यात आली होती. कोयना प्रकल्पाच्या पहिल्या दोन टप्प्यांचे काम पूर्ण होत आलेले असताना अलोरेत तिसऱ्या टप्प्याचे काम सुरू करायला हवे, असा विचार पुढे आला होता. पहिल्या दोन टप्प्यातील वीजनिर्मितीचे पाणी समुद्राला मिळत होते. हा परिसर समुद्रसपाटीपासून उंच होता. त्या उंचीचा उपयोग करून विद्युतगृह उभारल्यास अधिकची वीजनिर्मिती शक्य असल्याचे लक्षात आले होते.

अलोरे वसाहत उभारली गेली

काम सुरू झाल्यावर सुरवातीला कोयनेतून नियमित अलोरे भागात खोलवर उतरायचे आणि पुन्हा कोयनेत परत यायचे, असा जाण्या-येण्याचा दिनक्रम सुरू होता. यात प्रवासात बराच वेळ जात होता म्हणून अलोरे वसाहत उभारली गेली. त्यामुळे कामाला अधिक वेळ देता आला. अलोरे वसाहत उभारणीची मूळकथा अशी असल्याचे त्यांनी नमूद केले. अलोरे शाळेने हा उपक्रम इथे केला त्यामुळे आम्हाला सर्वांना एकत्रित येता आलं. जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. याबद्दल भेलके यांनी शाळेचे आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोन जणांचा जीव घेऊनही आरोपी का सुटला? कायदा काय सांगतो? कायदेतज्ज्ञांनी सांगितल्या तरतुदी

Lok Sabha Election 2024 : दिव्यात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; मतदारांत तीव्र संताप

Nashik Lok Sabha: नाशिकमध्ये आमदार देवयानी फरांदे माजी आमदार वसंत गीतेंमध्ये वाद; बूथवर उडाला गोंधळ

IPL 2024: 'मला फक्त शेवटची संधी द्या...', RCB कडून खेळणाऱ्या स्वप्नील सिंगला व्यक्त होताना अश्रु अनावर

Pune Rain Updates : पुण्यात पावसाचा उद्रेक! कुठे झाडं कोसळली, कुठे पत्रे उडाले तर अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी

SCROLL FOR NEXT