Bacchu Kadu
Bacchu Kadu 
पश्चिम महाराष्ट्र

पुजारी हटावप्रश्‍नी अधिवेशनात आवाज उठवणार : बच्चू कडू

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर - श्री अंबाबाईचे "लक्ष्मीकरण' म्हणजे धर्मद्रोहच आहे. मंदिरातील पुजारी हटावप्रश्‍नी येत्या पावसाळी अधिवेशनात आवाज उठवणार असल्याचे आज प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. दरम्यान, या प्रश्‍नी राज्य शासनाने तत्काळ हस्तक्षेप करून एका महिन्यात संबंधितांवर कारवाई करणे गरजेचे आहे. त्याशिवाय पुजाऱ्यांच्या संपत्तीची माहिती घेऊन ती कुठून आली, याचाही लेखाजोखा मांडला गेला पाहिजे, अशी मागणीही त्यांनी या वेळी केली. 

श्री अंबाबाई मंदिर पुजारी हटाव संघर्ष समितीच्या पाठिशी ठामपणे असल्याचे सांगून आमदार कडू म्हणाले, ""अंबाबाई मंदिरातील पुजाऱ्यांबाबत सध्या आंदोलन तीव्र झाले आहे. मात्र, येत्या काळात इतरही धार्मिक देवस्थानांतील देणग्यांची रक्कम लोकहितासाठी वापरली जावी, यासाठी आंदोलन उभे करावे लागणार आहे. अंबाबाई मंदिरातील विविध प्रश्‍नांसाठी सुरू असलेल्या आंदोलनात शासनाने लक्ष घालून मार्ग काढला नाही, तर रस्त्यावर उतरून आंदोलन अधिक तीव्र केले जाईल.'' 

सरकारने दिलेली कर्जमाफी फसवी असून मुख्यमंत्री, महसूलमंत्री आणि सहकार मंत्री अजूनही अभ्यास करीत असून आता ते पाचवा शासन निर्णय लवकरच जाहीर करतील, असा आरोपही आमदार कडू यांनी या वेळी केला. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करायला भाग पाडल्याशिवाय आम्ही आंदोलन थांबवणार नाही. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये त्यासाठी दिल्ली गाठणार असल्याचेही कडू यांनी सांगितले. पुजारी हटाव संघर्ष समितीचे सदस्य डॉ. सुभाष देसाई, शरद तांबट, वसंतराव मुळीक, जयश्री चव्हाण, चारूलता चव्हाण आदी या वेळी उपस्थित होते. 

सदाभाऊ चुकलेच... 
कुणा नेत्याच्या आदेशाने नव्हे, तर शेतकऱ्यांनी यंदा स्वयंस्फूर्तीने राज्यव्यापी संप पुकारला. त्यातून मार्ग काढताना सदाभाऊ खोत यांनी शेतकऱ्यांची बाजू मांडली असती तर त्यांना मंत्रिपदापेक्षाही आणखी मोठा मान शेतकऱ्यांनी दिला असता, असेही आमदार कडू म्हणाले. खासदार राजू शेट्टी आणि सदाभाऊंमध्ये मध्यस्थी करण्याएवढा मी मोठा नाही. मी कार्यकर्ता बच्चू म्हणूनच योग्य आहे असे सांगताना, तसेच विरोधी पक्षातल्या कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर बोलताच येणार नाही, असेही ते म्हणाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Constitution : '...तर मोदी सरकारने केव्हाच देशाचे संविधान बदलले असते'

Pratik Gandhi : प्रतीक साकारतोय गांधी ; हॅरी पॉटर फेम 'या' अभिनेत्याची सिनेमात वर्णी

Reels Addiction : इन्स्टाग्राम अन् यूट्यूबचं कशामुळे लागतंय व्यसन? जाणून घ्या कसं काम करतं अल्गोरिदम..

Rishabh Pant: "ऋषभ पंतसोबत लग्न कर, तो तुला खुश ठेवेल..."; नेटकऱ्याची कमेंट, उर्वशीनं अवघ्या दोन शब्दात दिलं उत्तर

'संजय राऊत माझा छळ करत आहेत'; निलम गोऱ्हेंनी वाचून दाखवलं स्वप्ना पाटकरांचं निवेदन

SCROLL FOR NEXT