नगर - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शनिवारी नगरमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. पक्षाध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी या वेळी मार्गदर्शन केले.
नगर - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शनिवारी नगरमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. पक्षाध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी या वेळी मार्गदर्शन केले. 
पश्चिम महाराष्ट्र

Vidhansabha 2019 : सत्ताधाऱ्यांनो, ‘चले जाव’! - शरद पवार

सकाळ वृत्तसेवा

विधानसभा 2019 : नगर - महात्मा गांधींनी ऑगस्ट क्रांतीची हाक देत इंग्रजांविरुद्ध ‘चले जाव’चा नारा दिला. दोनवेळचा घास भरवणाऱ्या शेतकऱ्यांबद्दल सरकारमध्ये अनास्था आहे, त्यामुळे काळ्या आईशी इमान न राखणाऱ्या भाजप सरकारला ‘चले जाव’ म्हणण्याची वेळ आली आहे. भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांना ‘ईडी’ची नोटीस आली होती. लफडी केली असतील, म्हणूनच ‘ईडी’चा ससेमिरा लागला. सत्तेच्या लालसेपोटी पक्षबदल करणाऱ्यांचा जनता बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिला.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या 
पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शनिवारी नगरमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. या वेळी पवार म्हणाले, ‘‘अधिकाऱ्यांना कानमंत्र देऊन सरकारने छावण्या बंद केल्या. शेतकऱ्यांविषयी अनास्था असलेले लोक सत्तेत बसले आहेत. 

राज्यात दुष्काळ, महापुरासारखी संकटे 
असताना ते सत्ता द्या म्हणत गावभर हिंडत राहिले. उद्योग- धंदे बंद पडत असल्याने हाताला काम नाही. ही स्थिती जर बदलायची असेल, तर सामूहिक शक्ती बरोबर घेऊन महाराष्ट्राचा चेहरा बदलूया. सरकारने कर्जमाफीचा शब्द पाळला नाही. मागील पाच वर्षांत १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. पदवीधर युवकांना नोकऱ्या नाहीत. नोकऱ्या नसल्याने लग्न होत नाही. मात्र, युतीचे सरकार बोलण्यातच पटाईत आहे.’’   

सत्ताधाऱ्यांनी उद्योगांच्या कर्जासाठी बॅंकांना ८७ हजार कोटींचा पुरवठा केला. देशाचे गृहमंत्री अमित शहा म्हणतात, उद्योगांना कर्ज देऊ; पण शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार नाही? दोनवेळेचा घास भरवणाऱ्या शेतकऱ्यांनी तुमचे काय घोडे मारले आहे? असा सवालही पवार यांनी उपस्थित केला. 

मेळाव्यानंतर धक्काबुक्की
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यानंतर आज (शनिवारी) दुपारी दोन गटांत जुंपली. एकमेकांना धक्काबुक्की केल्यानंतर दोन्ही गट थेट पोलिस ठाण्यात गेले. मात्र, वरिष्ठ नेत्यांनी कानपिचक्‍या दिल्यानंतर त्यांच्यात समेट झाला आणि ते तक्रार न देताच निघून गेले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Revanth Reddy: शहांचा 'तो' व्हिडिओ शेअर करणं भोवलं! तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी दिल्लीला बोलावलं

Rohit Pawar : विधानसभेआधी माझा अरविंद केजरीवाल करतील; आमदार रोहित पवार यांचा खळबळजनक दावा

CSK च्या मिचेलने एक-दोन नाही, तर पकडले तब्बल 5 कॅच अन् IPL मध्ये रचला मोठा विक्रम

Narendra Modi : ''कर्नाटकमध्ये संविधान बदलण्याचा प्रयत्न, परंतु जोपर्यंत मोदी जिवंत आहे तोपर्यंत..'' पंतप्रधान नेमकं काय म्हणाले?

Salman Khan Firing Case : सलमान खान गोळीबार प्रकरणातील चारही आरोपींना मोक्का कोर्टासमोर केलं हजर

SCROLL FOR NEXT