Solapur
Solapur 
पश्चिम महाराष्ट्र

कोरेगावची दंगल ही राज्यातील अखेरची दंगल ठरावी : आ. भालके

हुकूम मुलाणी

मंगळवेढा (सोलापूर) : महाराष्ट्रात अनेक जातीय दंगली झाल्या समाजामध्ये सकारात्मक आणि बंधुत्वाचा संदेश देणाऱ्या चोखोबा ते तुकोबा, या समता वारीमुळे भीमा कोरेगावची दंगल ही राज्यातील अखेरची दंगल ठरावी. असे मत आ. भारत भालके यांनी व्यक्त केले.                              

वृंदावन फाऊंडेशन पुणेच्या वतीने कोरेगांव-भिमा प्रकरणानंतर तरूणांना मानवतेचा संदेश देण्यासाठी श्री संत चोखामेळा समाधी ट्रस्ट व वारी परिवार सहकार्यातून मंगळवेढा ते देहु पर्यंत काढलेल्या समता वारीचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, राहूल शहा, नगराध्यक्षा अरुणा माळी, उपनगराध्यक्ष चंद्रकांत घुले, पक्षनेते अजित जगताप, प्रवीण खवतोडे, पांडुरंग नाईकवाडी, राहूल सावंजी, मारूती वाकडे, पी.बी.पाटील, समता वारी संयोजन समितीचे डी. एस. काटे, प्रा.सुरेखा भालेराव, उपाध्यक्ष महारुद्र जाधव, वाहिद पाशा शेख, विजयसिंह जगदाळे, श्रीधर कांबळे, डॉ. खुशाल मुंडे, उस्मान अली शाह साब, गंगाधर अहिरे, सिध्दाराम पाटील, फुलचंद नागटिळक सतीश दत्तू आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना आ. भालके म्हणाले की, चोखोबा ते तुकोबा, एक वारी समतेची या उपक्रमाच्या माध्यमातून समतेचा विचार समाजात जावा आणि ही चळवळ समाजात रुजावी. समतेने जर आपण पुढे गेलो तरच समाजाचा विकास होणार आहे. प्रा. लक्ष्मण ढोबळे, म्हणाले की, आधात्माचा विषय हा माणसांची मने जोडणारा विषय आहे. त्यामुळे या चोखोबा ते तुकोबा या वारीच्या माध्यमातून समाजातील दुभंगलेली मनं जोडली जावीत राजकारण्यांच्या नादाला लागून बिघडलेल्या समाजाला सुधारण्याचे काम तुकोबा आणि चोखोबा यांच्या शिकवणीत आहे. नगराध्यक्षा अरूणा माळी म्हणाल्या की चोखोबा ते तुकोबा या वारीच्या माध्यमातून समतेचा संदेश निश्चितपणे दिला जाणार आहे. संताच्या भुमीतून या समता वारीचे प्रस्थान होत आहे ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. प्रास्ताविक समता वारीचे निमंत्रण सचिन पाटील यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Insurance: विमा घेऊनही चिंता कायम! 43 टक्के पॉलिसी धारकांना मिळत नाही क्लेम; धक्कादायक अहवाल समोर

Water Crisis: देशासमोर पाण्याचे संकट, 150 प्रमुख जलाशयांमधील पाण्याची पातळी घसरली

लग्न झालेलं असो किंवा नसो, स्वेच्छेने ठेवलेल्या लैंगिक संबंधांना चुकीचं म्हणता येणार नाही- हायकोर्ट

Panchayat 3 Release Date Out: प्रतीक्षा संपली! 'पंचायत-3' ची रिलीज डेट जाहीर, 'या' दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार सीरिज

Latest Marathi News Live Update : दिल्लीच्या रस्त्यावर थरार, पोलीस गुंडांमध्ये चकमक

SCROLL FOR NEXT