पश्चिम महाराष्ट्र

या देशात कोरोना नियंत्रणासाठी सैन्य रस्त्यावर

शाहबाज-असिया पठाण, जोहान्सबर्ग (दक्षिण आफ्रिका)


 गेल्या 26 मार्चला इथे लॉकडाऊन जाहीर झाला. मात्र पंतप्रधान सिरिल रामाफोसा यांनी तो आधी तीन दिवस जाहीर केला. त्यामुळे या काळात प्रत्येकाला आपआपल्या घरी सुखरुप जाता आले. आम्ही राहतो त्या जोहान्सबर्गमध्ये लोकसंख्या मोठी आहे. गुन्हेगारीही अधिक आहे. त्यामुळं पहिल्या टप्प्यात शासनाने सैन्य मागवले. त्यामुळे सध्या तरी सारे काही नियंत्रणात आहे. 

देशात आत्तापर्यंत 11 हजार 350 रुग्ण आढळले असून त्यापैकी 206 मृत्यू झाले आहेत. सुमारे 5 कोटी 83 लाख लोकसंख्येचा हा देश क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगात पंचविसावा आहे. मुळ भारतीय वंशाचे लोक मोठ्या संख्यने या देशात आहेत. शिवाय नोकरीच्या निमित्ताने अनेक भारतीय इथे स्थिरावले आहेत. आम्ही इथल्या ऍब्सा बॅंकेत सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करतो. वांशिक भेदभावाबद्दल नाचक्की असलेला हा देश आता मात्र खूप चांगले बदल झाले आहेत. कृष्णवर्णिय आणि मुळ भारतीय वंशाचे लोक इथल्या राजकीय-प्रशासकीय सत्तेत आहेत. पंतप्रधान रामाफोस देखील कृष्णवर्णीयच आहेत. त्यांच्यावर जनतेचा मोठा विश्‍वास आहे. त्यांनी कोरोनासाठी केलेल्या उपाययोजनांबद्दल लोक समाधानी आहेत. 
टाळेबंदीचा अन्य देशांप्रमाणेच दक्षिण आफ्रिकेवर खूप मोठा आर्थिक परिणाम झाला आहे. या काळात तीस टक्के बेरोजगार झाले आहेत. त्यांची नोंदणी झाली असून शासनाने त्यांना सुमारे दहा हजार रुपये बेरोजगार भत्ता देऊ केला आहे. बॅंकेचे हप्ते भरण्यास इथेही तीन महिन्यांची मुभा दिली आहे. सरकारी आणि खासगी अशा दोन्ही आरोग्यव्यवस्था इथे आहेत. त्यांची युध्दपातळीवर सज्जता सुरु आहे. आमच्या शहरात घरोघरी जाऊन दहा हजारांवर आरोग्य कर्मचारी तपासण्या करीत आहेत. तात्पुरती हॉस्पिटल्स उभारणी सुरु आहे. यामागे साथीच्या उद्रेकाची भिती हेच कारण आहे. त्यादृष्टीने सारी हालचाल सुरु आहे. कारण पुढे हिवाळा येऊ घातलाय. त्यामुळे हिवाळ्यासाठी पुरक अशा सर्व उद्योगांनाही टाळेबंदीतून मुभा दिली आहे. 
इथे कायद्याची कठोरपणे अंमलबजावणी होते. बंदी असलेल्या दारु-सिगारेटसह कोणी आढळल्यास अटक-दंड होतो. मास्क कंपलसरी. एडस्‌-टीबीचे इथे पुर्वी दुर्लक्ष झाल्याने देशाने मोठी किंमत मोजली होती त्यामुळे यावेळी सरकारने खूप दक्षता घेतली आहे. इथे आपल्या धारावीसारख्या झोपडपट्टया आहेत. तिथे तर सैन्य झाडाझडती घेतेय. आणखी काही दिवस तरी सैन्याचा ताबा असेल. त्यानंतर पोलिस दलाकडे नियंत्रण जाईल. इथे क्राईम रेट मोठा आहे. 
सध्या इथेही अनेकांच्या नोकऱ्या जात आहेत. अनेकांना सक्तीच्या रजेवर जावे लागलेय. कोसळलेले अर्थकारण कधी सावरेल याबद्दल अंदाज नाही. भारतातून नोकऱ्यांसाठी आलेल्यांची संख्या मोठी आहे. त्यांच्यावर अद्याप तरी गंडातर नाही. मात्र परिस्थिती कसे वळण घेईल त्यावर सारे काही ठरेल. 
..........  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray visits Meenatai Thackeray statue : उद्धव ठाकरेंनी केली मीनाताईंच्या पुतळ्याची बारकाईने पाहणी अन् म्हणाले ‘’या मागे दोनच व्यक्ती…’’

World Athletics Championships : नीरज चोप्राने एकाच प्रयत्नात केले सर्वांना गार, आता पाकिस्तानच्या अर्शद नदीमच्या कामगिरीकडे लक्ष

Uddhav Nimse : मुंबई हायकोर्टाकडूनही जामीन नाकारला: उद्धव निमसे अखेर पोलिसांपुढे शरण

Navratra and Overthinking Tips: मन गोंधळले असेल तर नवरात्रीचे ९ दिवस देतील नवा आधार! अशी करू शकता ओव्हरथिंकिंगवर मात

Jalaj Sharma : जिल्हाधिकारी जलज शर्मांची मोठी घोषणा: नाशिकमधील गड-किल्ले होणार स्वच्छ

SCROLL FOR NEXT