workers.jpg
workers.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

शंभर बिहारी कामगारांची  जबाबदारी उचलली सावळी गावाने 

सकाळवृत्तसेवा

सांगली- औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांमध्ये आणि बेदाणा कोल्ड स्टोअरेज मध्ये कामाला आलेल्या शंभराहून अधिक बिहारी कामगारांची जबाबदारी सावळी ( ता. मिरज ) गावाने उचलली आहे. या कामगारांनी कोरोनाच्या तणावातून गावाकडे पलायन करण्याचा प्रयत्न करू नये, यासाठी त्यांना सर्व ती मदत गावातर्फे केली जाणार आहे. माजी पंचायत समिती सभापती अण्णासाहेब कोरे यांनी ही माहिती दिली. 

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी देशभरात लॉक डाऊन करण्यात आले आहे. उत्तर भारतातून आलेल्या कामगारांची कामे ठप्प आहेत. महाराष्ट्रातून अनेक बिहारी आणि उत्तर भारतीय कामगार मिळेल त्या पद्धतीने आपल्या गावी जाऊ पहात आहेत. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील सर्व सीमा रोखण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रचंड मोठी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. या स्थितीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर भारतीय कामगारांना आहे तेथेच थांबा, असे आवाहन करतानाच त्यांची जबाबदारी स्वीकारली आहे. 


परप्रांतिय शंभराहून अधिक कामगार सावळी गावाच्या हद्दीत राहतात. मिरज-पंढरपूर रस्त्यावरील हे गाव औद्योगिक वसाहतीच्या जवळ आहे. येथे मोठ्या प्रमाणात बेदाणा शीतगृहे आहेत. याठिकाणी हे कामगार कामाला आहेत. त्यांनी बंद स्थितीत अस्वस्थ होऊ नये, गाव सोडण्याचा विचार करू, असे आवाहन सावळी ग्रामपंचायतीतर्फे करण्यात आले आहे. या लोकांना राज्य शासनाकडून मिळणारी मदत आणि धान्य घरपोच मिळेल अशी व्यवस्था केली जाणार आहे. शिवाय त्यांना अन्य काही अडचण आली तरीही गाव त्यांच्या पाठीशी उभे राहणार आहे. त्यामुळे या बिहारी कामगारांनी गावातच थांबण्याचा निर्णय घेतला आहे. अशा पद्धतीने गावांनी पुढाकार घेतला तर परप्रांतीय कामगारांचे लोंढे परत गावाकडे फिरायचे थांबतील, अशी अपेक्षा श्री. कोरे यांनी व्यक्त केली. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : भाजपचे दिल्ली तख्त ‘महाराष्ट्र’च खेचणार : उद्धव ठाकरे

Dushyant Chautala: "...तर सरकार पाडण्यास मदत करू," माजी उपमुख्यमंत्र्याने काँग्रेसला पाठिंबा देत वाढवले भाजपचे टेन्शन

Gaurav More : गुडबाय हास्यजत्रा ; गौरवने घेतला हास्यजत्रेचा निरोप ; समीर दादा म्हणाला...

"मी माझ्या मुली घेऊन चालले..."; व्हिडिओ पोस्ट करत विवाहितेने जीवन संपवलं, दोन मुलींना दिलं विष

Latest Marathi News Live Update : MoCA ने एअर इंडिया एक्स्प्रेसकडून उड्डाणे रद्द करण्याबाबत मागवला अहवाल

SCROLL FOR NEXT