jayant
jayant  
पश्चिम महाराष्ट्र

रुग्ण दवाखान्यात आला की दगावता कामा नये ः जयंत पाटील 

अजित झळके

सांगली ः कोरोना बाधित रुग्ण वेळेत रुग्णालयात दाखल झाला तर तो जगला पाहिजे. तो दगावता कामा नये आणि त्यासाठी सर्व ती काळजी डॉक्‍टरांनी घेतली पाहिजे. सांगलीत काही ठिकाणी तसे होताना मला दिसत नाही. हे योग्य नाही, अशा शब्दांत पालकमंत्री जयंत पाटील यांनी आज कोरोना मृत्यूदराबाबत महत्वाचे विधान केले. 


येथील श्री भगवान महावीर कोविड सेंटरचे उद्‌घाटन श्री. पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्यांनी जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीवर महत्वाचे भाष्य केले. ते म्हणाले, ""जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची मृत्यूची वाढती संख्या चिंता वाढवणारी आहे. हे प्रमाण कमी झाले पाहिजे. रुग्णांचा जीव वाचला पाहिजे. जर रुग्ण वेळेत रुग्णालयात दाखल झाला तर त्याला उपचार मिळालेच पाहिजेत आणि त्यासाठी आवश्‍यक ते सारे डॉक्‍टरांनी केले पाहिजे.

त्यासाठी कोविडच्या तज्ज्ञांचा सल्लाही डॉक्‍टरांनी घ्यावी. इस्लामपूरमध्ये आज तशी सुविधा आम्ही सुरु केली. सांगलीत ऐनवेळी काही गरज लागली तर डॉक्‍टरांनी तशा यंत्रणेचा वापर करावा. माझे एक मित्र मुंबईतील तज्ज्ञ डॉक्‍टर आहेत. त्यांचीही मदत आपण घेऊ शकतो. पण, रुग्ण दगावता कामा नये.'' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Rally Pune: "एका अतृप्त आत्म्यानं महाराष्ट्रासह देशाला अस्थिरतेत लोटलं"; PM मोदींकडून नाव न घेता शरद पवारांवर घणाघाती टीका

Modi Rally Pune: "तुम्ही लवकरच देशातील पहिल्या बुलेट ट्रेनमधून प्रवास कराल"; PM मोदींनी पुणेकरांना दिली गॅरंटी

Latest Marathi News Live Update : महायुती महाराष्ट्रातल्या विकासाचा अनुशेष भरुन काढेल- मोदी

Inheritance Tax: "निझामाच्या काळातही हे झालं नाही, आता लोकशाही..."; खर्गेंचं 'वारसा कर'च्या आरोपांना उत्तर

Aamir Khan : आणि 'महाराष्ट्र बंद' ने पालटलं आमिरचं नशीब

SCROLL FOR NEXT