people get water even after filling two thousand per acre? 
पश्चिम महाराष्ट्र

एकरी दोन हजार भरूनही पाणी मिळेना, काय झाले?

सकाळवृत्तसेवा

आरग : नेहमीच दुष्काळी भागाला जीवनदायी ठरणारी म्हैसाळ योजना साडे तीन महिन्यांपूर्वी सुरू झाली. पण, या वर्षी मिरज पूर्व भागातील शेतकरी अद्याप पाण्यापासून वंचित आहे. योजनेची एकरी दोन हजारे प्रमाणे पाणी पट्टी भरून सुद्धा पाणी न मिळाल्याने शेतकरी आक्रमक झाला आहे. पाणी उशाला आणि कोरड घशाला अशा परिस्थितीमुळे पूर्व भागातील पाणी प्रश्न ऐरणीवर आला आहे.

पूर्व भागात लोकप्रतिनिधींनी दौरा केला. दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. दोन-चार दिवसांत पाणी सोडण्याची पोकळ आश्वासने देण्यात आली. पण महिना उलटला तरी अद्याप पाणी शिवारात आले नाही. गावातील पाझर तलाव भरून देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली, पण अद्याप पाणी आले नाही. पाणी येणार या आशेवर शेतकरी जगत आहे. 
वाढत्या तापमानामुळे या वर्षी फेब्रुवारी महिन्यापासून पाणी टंचाई जाणवत आहे. मे महिना संपत आला तरी पाण्यासाठी घसा कोरडाच आहे.

पूर्व भागातील संपूर्ण गावात पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरी अखेर कोरड्याच राहिल्या. योजना गावाच्या दाराशी आहे. पण पिण्यासाठी पाणी नाही. भूजल पातळी खालावली. पिके करपली तसेच शेतीसाठी पाण्याची गरज आता आहे. पण पावसाळ्यात महापुराचे पाणी घेऊन काय करायचे असा सवाल आक्रमक शेतकरी करीत आहे. 

कोरोनाच्या महाभयंकर आपत्तीमध्ये येथील शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. पाणी सोडण्याची जोरदार मागणी केली जात असून पूर्व भागात दौरा केलेल्या लोकप्रतिनिधींच्याकडून फक्त बघ्याची भूमिका होत आहे. 

पूर्व भागाला कोणी वाली आहे का?
गत वर्षी मे महिना लोटला तरी पाणी सोडण्यात आले नाही. पाण्यासाठी समस्येत वाढ होत असून पूर्व भागाला कोणी वाली आहे का नाही असा सवाल आक्रमक शेतकरी करीत आहेत. होरपळलेल्या पिकांना आधार देण्यासाठी पाणी सोडण्याची मागणी आमची आहे. 
- दाजी खोत, माजी सरपंच, लक्ष्मीवाडी. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : पुण्यात महात्मा गांधीजींच्या पुतळ्याचे शिर उडवण्याचा प्रयत्न; एकाला पोलिसांनी घेतले ताब्यात

Lottery Scam : लॉटरीच्या नावाखाली दाम्पत्याने 600 लोकांना 40 कोटींचा घातला गंडा; लोकांनी 5 ते 10 लाखांपर्यंत केली होती गुंतवणूक

Maharashtra Rain Update News : राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस, पुढील पाच दिवस महत्वाचे; ११ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

IT Park:'जमीन पसंत पडेना, आयटी पार्क होईना'; प्रशासनाचा कागदी खेळ, कृषि महाविद्यालयला पर्यायी प्रस्ताव मान्य नाही

Indian Railways: मिनिटाला निघणार दीड लाख तिकिटे; रेल्वे प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय,आरक्षण केंद्रातील यंत्रणेत बदल

SCROLL FOR NEXT