People's eyes ... When will the red fairy come to the village? 
पश्चिम महाराष्ट्र

लोकांच्या नजरा...गावाकडे लालपरी येणार कधी ? 

सचिन निकम

लेंगरे : ग्रामीण भागात गरागरा फिरणारी लालपरीची चाके गेल्या सहा महिन्यांपासून थांबली आहेत. यामुळे सामान्य लोकांची कुठेही येण्या-जाण्यासाठी गैरसोय होत आहे. त्यामुळे गावाकडे लालपरी कधी येणार याकडे लोकांच्या नजरा लागल्या आहे. 

कोरोना महामारी आटोक्‍यात आणण्यासाठी शासनाने सर्व सार्वजनिक सेवा बंद केल्या होत्या. यानंतर अनलॉक करत काही सेवा सुरु केल्या. यामध्ये लांबपल्याची बससेवा सुरू केली. मात्र ग्रामीण भागात सोडल्या जाणाऱ्या एसटीच्या फेऱ्या अद्याप सुरु केलेल्या नाहीत. यामुळे आडमार्गी असणाऱ्यांना गावकऱ्यांन पायपीट करावी लागत आहे. गावात एसटी येत नसल्याने त्यांना खासगी वाहने, ऑटोरिक्षा यांचा आधार घ्यावा लागतो आहे. वयोवृद्ध लोकांना वैद्यकीय सेवा, इतर महसुली कामासाठी तालुक्‍याच्या ठिकाणी जाताना अडचणींचा सामना करावा लागतो आहे. 

अनलॉक एक, दोन मुळे शहरी भागात अनेक सेवा सुरू झाल्या. मात्र ग्रामीण भागातील परिस्थितीत फारशी बदलली नाही. अतिवृष्टी, व्यवसायातील मंदी यामुळे ग्रामीण भागाचा कणा असणारे शेतकरी, व्यावसायिकांचे पुरते कंबरडे मोडले आहे. यातच भर वाहतुकीची पडली. ग्रामीण भागातून तालुक्‍यास जाण्यासाठी खासगी वाहनांना जास्त पैसे मोजावे लागत आहेत. रुग्णांना वैद्यकीय सेवा देण्यासाठी खासगी वाहनधारक तयार होत नसल्याने वयोवृद्धांची हेळसांड होत आहे. लालपरी सुरु झाल्यास सामान्य लोकांची परवड थांबणार आहे. 

मागणी आल्यास बस सुरू 
ग्रामीण भागातील बससेवा पुर्ववत कधी होईल याविषयी आगार व्यवस्थापक अविनाश थोरात यांच्याकडे विचारणा केली असता, ज्या ग्रामपंचायती बससेवा सुरू करण्यासाठी मागणी करतील. त्या ठिकाणी बससेवा सुरू करण्याचे निर्देश महामंडळाने दिले आहेत. त्यामुळे मागणी आल्यानंतर त्या गावात बससेवा सुरू करण्यास प्राधान्य दिले जाणार आहे. शाळा महाविद्यालये सुरु झाल्यानंतर विनाशर्त सुरळीत बससेवा सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले.


संपादन : प्रफुल्ल सुतार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT