पश्चिम महाराष्ट्र

कृषी, ग्रामविकासातूनच सगळे प्रश्‍न सुटतील - पोपटराव पवार

सकाळवृत्तसेवा

सांगली - पाणी, पर्यावरण, कृषी आणि ग्रामविकासाच्या मुद्द्यांवर देशातील सर्व पक्षांनी एकत्र येऊन कामे केले पाहिजे. तरुणाईने कोणत्याही धर्माचा झेंडा उचलण्यापेक्षा याप्रश्‍नी सक्रिय सहभागाचा तिरंगा हाती घेतला तरच सध्याचा बेरोजगारीपासून ते आरक्षणापर्यंतचे प्रश्‍न सुटू शकतील, असे स्पष्ट मत हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार यांनी व्यक्त केले.

येथील विलिंग्डन महाविद्यालयाच्या शताब्दी महोत्सव प्रारंभानिमित्त आयोजित व्याख्यानमालेत ते बोलत होते. जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष दिलीप पाटील अध्यक्षस्थानी होते. प्राचार्य डॉ. भास्कर ताम्हणकर, डॉ. बिराज खोलकुंबे आदी उपस्थित होते. 

देशातील आरक्षणाच्या सर्व मागण्या मान्य केल्या  तरी सर्व तरुणांच्या बेरोजगारीचा प्रश्‍न सुटणार नाही. कारण विषय खूप वेगळा आहे, असे सांगत श्री. पवार म्हणाले, ‘‘स्वतंत्र भारताची दिशा सांगताना महात्मा गांधीजींनी ग्रामीण भागात सर्वाधिक जनता राहते आणि तिच्याशी निगडित प्रश्‍नांवर सर्वात आधी काम करा, खेड्याकडे चला, असा संदेश दिला होता.

स्वातंत्र्याच्या ७२ वर्षांत आपण ते करू शकलो का, यावर विचार करून पुढचे धोरण ठरविणे गरजेचे आहे. आरक्षणातून संरक्षण हवंय, मात्र त्यापलीकडे जाऊन मूळ विषयांना भिडण्याची गरज आहे. पाण्याचा ताळेबंद, पर्यावरण संवर्धन असे विषय अभ्यासक्रमात का नाहीत? 

आम्ही विकासदराची चर्चा करतो, मात्र त्या विकासातून किती लोकांना आनंद मिळतो? स्वातंत्र्य लढ्यात तरुणांना झपाटले होते, आता सारे सैराट आहेत. नक्की सैराट व्हा, मात्र पाणी आणि पर्यायवरणासारख्या प्रश्‍नांवर लढण्यासाठी व्हा.’’

ते म्हणाले,‘‘या देशातील भूक संपली आहे, मात्र  कुपोषण सुरू झालेय. किचनमध्ये आरोग्यासाठी नव्हे तर जीभेसाठी पदार्थ बनतात. शेतीत पाण्याचा बेसुमार वापर, रासायनिक खते, औषधांची प्रचंड मात्रा यामुळे कर्करोग, मधुमेहाची समस्या प्रचंड मोठी बनली आहे अशावेळी मुळातून बदलाची गरज आहे. फेसबूक, वॉटस्‌ॲप आणि टीव्हीच्या रिमोटनी बांधून घातलेला माणूस मोकळा करण्याची गरज आहे. तो निसर्गाशी जोडण्याची गरज आहे.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madha Loksabha: मावळत्या सूर्याची शपथ अन् शरद पवार... मोदींची टीका; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?

Latest Marathi News Live Update : प्रज्वल रेवण्णा स्कॅंडल प्रकरणात जनता दल सेक्युलर पक्षाची मोठी कारवाई

मोहन जोशींना झाला होता मालिका सोडल्याचा पश्चाताप; जाणून घ्या शूटिंगदरम्यानचा 'तो' भन्नाट किस्सा...

Aamir Khan: "मुसलमान असल्यामुळे मला नमस्कार करण्याची सवय नव्हती पण..."; आमिरनं सांगितला पंजाबमधील 'तो' किस्सा

वॉशिंग्टन पोस्टच्या रिपोर्टमधील गंभीर आरोपांवर भारताचे सडेतोड उत्तर; काय करण्यात आलाय दावा?

SCROLL FOR NEXT