kolhapur 
पश्चिम महाराष्ट्र

पुणे-बंगळूर महामार्ग अत्यावश्यक वस्तूंसाठी सुरु; अद्याप दीडफूट पाणी 

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : महापुरामुळे गेल्या आठ दिवसांपासून पुराच्या पाण्याने वेढलेल्या पुणे-बंगळूर महामार्गावरील सांगली फाटा ते तावडे हॉटेल दरम्यानचा महामार्ग आज (सोमवारी) सकाळी तातडीच्या वस्तू वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस, सिलिंडर, औषधे तसेच भाजीपाल्यासाठी वाहतूक सुरू करण्यात आले आहे.

महामार्गावरील पाण्याची पातळी झपाट्याने ओसरू लागली आहे. आज सकाळी आठ वाजता पाण्याची पातळी दोन फुटावर होती. पोलिस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे, आमदार अमोल महाडिक, शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक किरण भोसले आदींनी महामार्गावर रस्त्याची सकाळी पाहणी केली. त्यानंतर इमर्जन्सी सेवेसाठी वाहतूक सुरू करण्यात आले आहे. गेल्या सहा दिवसांपासून महामार्ग वाहतुकीला बंद करण्यात आल्याने हजारो वाहने रस्त्याच्या दुतर्फा अडकून आहेत. पाण्याची पातळी दुपारपर्यंत आणखी ओसरेल. त्यानंतर रस्त्यात अडकलेल्या वाहनांबाबत निर्णय होईल, असेही पोलिस अधीक्षक देशमुख यांनी सांगितले

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील चारचाकी वाहने वगळता अवजड वाहतूक सोमवारी दिवशीही ठप्पच होती. महामार्गावरील पूर्ण पाणी ओसरल्याशिवाय सर्व वाहनांची वाहतूक पूर्णपणे सुरू होणार नसल्याचे त्यांनी सांगितले. संततधार पाऊस व धरणांतील पाणी विसर्गामुळे ठिकठिकाणी उद्‌भवलेल्या पूरस्थितीमुळे सातारा जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावरील अवजड वाहतूक मंगळवारपासून ठप्प झाली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News : बीपी तपासायला सांगताच घातला गोंधळ, उपचार सुरु असतानाच रुग्णाच्या कुटुंबियांचा डॉक्टरांवर हल्ला, नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update: बीडच्या गेवराईत रहात्या घरातच युवकाने घेतला गळफास

Ranji Trophy: जैस्वालचे अर्धशतक, मुशीर खानही लढला; पण मुंबईचा संघ पहिल्याच दिवशी गडगडला

Georai News : फार्मर आयडी नसल्याने अडकले गेवराईतील सोळा हजार शेतक-यांचे अतिवृष्टीचे अनुदान; सवा लाख शेतक-यांचे झाले होते नुकसान

Georai Crime : धुमेगाव शिवारात दोनशे किलोची गांजाची झाडे जप्त; बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

SCROLL FOR NEXT