पश्चिम महाराष्ट्र

सांगलीतील आमराई ऑफिसर्स क्‍लबमध्ये जेवणाच्या बिलावरून राडा

सकाळ वृत्तसेवा

सांगली - येथील उच्चभ्रूंच्या आमराई ऑफिसर्स क्‍लबमध्ये जेवणाच्या बिलावरून राडा झाला. नऊ जणांनी हॉटेलची तोडफोड केली, कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकीही दिली. सोमवारी (ता.9) रात्री बाराच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अवधुत सरदार शेळके (26), अच्युत सरदार शेळके (23), सुरज प्रकाश शहा (30), सात्वीक शहा (28 सर्व रा. गुलमोहर कॉलनी), सुरज उदयकुमार शरनाते (28, रा. विठ्ठलनगर), सुरज शंकर कुंभार (27), प्रतीक हणमंत तीळे (27), प्रवीण युवराज जाधव (23), वैभव सुरेश खाडे (23, सर्व रा. चांदणी चौक) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. सहायक व्यवस्थापक अमोल नामदेव काशीद यांनी फिर्याद दिली. 

अधिक माहिती अशी, की आमराई उद्यानाजवळ ऑफिसर्स क्‍लब आहे. याठिकाणी शासकीय अधिकाऱ्यांसह उच्चभ्रूंची नोंदणी आहे. संशयित सारेजण सोमवारी (ता.9) क्‍लबमध्ये जेवण्यासाठी आले होते. रात्री बाराच्या सुमारास जेवणाचे बील देण्याच्या कारणातून हॉटेलमधील कर्मचारी रिंकू विश्‍वकर्मा, अनुज विश्‍वकर्मा यांच्याशी वाद घालण्यास सुरूवात केली. तसेच शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकीही दिली. त्यानंतर हॉटेलमधील साहित्यांची तोडफोड केली. क्‍लब व्यवस्थापनाने तातडीने पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. 

दरम्यान, ऑफिसर्स क्‍लब व्यवस्थापनाने तातडीने संबंधितांवर निलंबन व प्रसंगी सदस्यत्व रद्द करण्याची कारवाई करण्याचा निर्णय घेतल्याचे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT