पश्चिम महाराष्ट्र

आटपाडीलगतच्या गावांचा साताऱ्यात पाण्यासाठी मोर्चा 

सकाळवृत्तसेवा

सातारा - माण तालुक्‍यातील उरमोडी व तारळी धरणांच्या पाण्यापासून वंचित राहणाऱ्या आटपाडी हद्दीजवळच्या 16 गावांतील ग्रामस्थांनी आज येथे आपल्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालय तसेच पाटबंधारे प्रकल्प मंडळाच्या अधीक्षक अभियंत्यांच्या कार्यालयावर मोर्चा काढला. 

ग्रामस्थांच्या या मोर्चास पोवई नाका येथून प्रारंभ झाला. तेथून जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, बॉम्बे रेस्टॉरंट चौकमार्गे कृष्णानगर येथील पाटबंधारे प्रकल्प मंडळाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. तेथे श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी उरमोडी व तारळी धरणांच्या पाण्यापासून वंचित राहणाऱ्या आटपाडी हद्दीजवळच्या 16 गावांमधील ग्रामस्थांच्या मागण्यांसदर्भातले निवेदन अधीक्षक अभियंत्यांना सादर केले. त्यावेळी अनिल देसाई, डॉ. प्रशांत पन्हाळकर, दत्तात्रय सोनवणे, सुरेश कदम, विजय जगताप, बाळासाहेब जगताप, बी. डी. जाधव यांच्यासह 16 गावांतील ग्रामस्थ उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salman Khan Firing: त्याने स्वतःला संपवलं नाही..अनुज थापरची हत्या? कुटुंबीयांच्या दाव्याने एकच खळबळ

ED: "जे काही चालले आहे ते अतिशय गंभीर आहे," कोर्टाने ईडीला का फटकारले? वाचा संपूर्ण प्रकरण

Heeramandi: हिरामंडी पाहिल्यानंतर 'या' कारणामुळे भडकला अभिनेता; म्हणाला, "इतका अन्याय का? निराशाजनक! "

SRH vs RR : आज पडणार धावांचा पाऊस! जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या राजस्थान रॉयल्सशी हैदराबादचा सामना

Latest Marathi News Live Update : अंधेरी पंप परिसरात मोठी आग, दारू दुकान जळून खाक

SCROLL FOR NEXT