mangalwedha
mangalwedha 
पश्चिम महाराष्ट्र

हमीभाव केंद्रातच हरभऱ्याची विक्री करावी - समाधान आवताडे

सकाळवृत्तसेवा

मंगळवेढा (सोलापूर) : दुष्काळी तालुक्यातील तुर, मका उत्पादकांना शेतकऱ्यांना हमी भाव केंद्रातुन जादा दर मिळाल्याने शेतकऱ्यांचा विश्वास वाढला असल्याने या केंद्रातच हरभऱ्याची विक्री करावी असे आवाहन दामाजीचे अध्यक्ष समाधान आवताडे यांनी व्यक्त केले. 

मंगळवेढा तालुका खरेदी विक्री संघ, महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशन व नाफेडच्या माध्यमातून हमीभावाने हरभरा खरेदीचा शुभारंभ बबनराव आवताडे यांच्या हस्ते करण्यात आला. अध्यक्षस्थानी समाधान आवताडे हे होते. यावेळी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष सिद्धेश्वर आवताडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष सोमनाथ आवताडे, सभापती प्रदीप खांडेकर, नाफेडचे अमोल गुरव, दामाजीचे संचालक सचिन शिवशरण, राजेन्द्र पाटील सुरेश भाकरे, सचिव सचिन देशमुख, राजाभाऊं चेळेकर, केशव आवताडे, सत्यजित सुरवसे, अजिम शेख, दत्तात्रय करे, राजाराम कालीबाग, फटेे, तालुक्यातील शेतकरी विविध संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना आवताडे म्हणाले की, चालू वर्षी 671 शेतकऱ्यांचा 7147.5 क्विंटल तर मका 14184 क्किंटल खरेदी करून खरेदी केलेल्या मक्याचे 6 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत. सध्या 4400 हमीभावा प्रमाणे 850 शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून या खरेदी केंद्रावर तालुक्यासह, सांगोला, पंढरपूर, मोहोळ, माळशिरस या पाच तालुक्यातील शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केल्याप्रमाणे मोबाईलवर मेसेज मिळताच शेतकऱ्यांनी हरभरा खरेदी केंद्रावर घेऊन यावे असे आवाहन आवताडे यांनी केले. यावेळी प्रास्ताविक गजानन पवार यानी केले तर आभार अशोक उन्हाळे  यांनी मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा ना'पाक' कृत्य! जम्मू-काश्मीरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला

IPL 2024 RCB vs GT Live Score: शुभमन गिलही स्वस्तात बाद! गुजरातच्या दोन्ही सलामीवीरांना सिराजने धाडले माघारी

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

MPSC : मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना; गट क संवर्गातील ७ हजार ५१० उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

SCROLL FOR NEXT