पश्चिम महाराष्ट्र

तारांकित प्रश्‍नामुळे पोटशूळ का?

सकाळवृत्तसेवा

विटा - जनतेचे प्रश्‍न विधानसभेत मांडणे, हे लोकप्रतिनिधी म्हणून माझे नैतिक कर्तव्यच आहे. त्यामुळे कुणाला वाईट वाटते किंवा चांगले वाटते याच्याशी मला काही देणं-घेणं नाही. माझी बांधिलकी विटेकर जनतेशी आहे. पाणीपुरवठा योजनेबाबत मी विधानसभेत तारांकित प्रश्‍न उपस्थित केला, त्यामुळे तुम्हाला एवढा पोटशूळ का व कशासाठी आलाय? अशा तीव्र शब्दांत टीका करीत आपण विटा पालिकेचे विश्‍वस्त आहात, मालक नाही. त्यामुळे माझ्याबद्दल बोलताना जबाबदारीने बोलावे, असा सल्ला आमदार अनिलराव बाबर यांनी पत्रकार परिषदेत माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव पाटील यांना नाव न घेता दिला आहे. या वेळी नगरसेवक अमोल बाबर, शिवसेनेचे शहरप्रमुख राजू जाधव उपस्थित होते.

आमदार बाबर म्हणाले, ‘‘विटा शहरातील उपनगरांमध्ये पाणीटंचाई आहे. त्या भागातील लोकांनी निवेदनाद्वारे माझ्याकडे मागणी केलेली होती. त्यामुळे विट्यातील पाणीटंचाईबाबत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी विधानसभेच्या अधिवेशनात तारांकित प्रश्‍न उपस्थित केला. मात्र, गेली दहा वर्षे आमदारकी तुमच्याकडेच होती. मग सभागृहात प्रश्‍न मांडला का..? प्रत्येक पालिका निवडणुकीवेळी पाणीपुरवठा योजनेबाबत आश्‍वासने दिली आहेत. मात्र, शहरातील सर्व उपनगरांना पुरेसे पाणी देऊ शकलेला नाहीत.  विटेकर जनतेच्या पाठबळावरच मी आमदार झालो आहे. त्यामुळे जनतेचे प्रश्‍न विधानसभेत मांडणे, हे लोकप्रतिनिधी म्हणून माझे नैतिक कर्तव्यच आहे. त्यामुळे कुणाला वाईट वाटते किंवा चांगले वाटते याच्याशी मला काही देणं-घेणं नाही. माझी बांधिलकी जनतेशी आहे. पाणीपुरवठा योजनेबाबत विधानसभेत तारांकित प्रश्‍न उपस्थित केला. त्यामुळे तुम्हाला एवढा पोटशूळ का व कशासाठी आला आहे? अशी टीका त्यांनी केली.

श्री. बाबर म्हणाले, ‘‘सध्याची पाणी योजना ही युती सरकारच्या काळातच मंजूर झाली होती. त्या वेळी फार मोठे काम केले, असे शासनाला तुम्हीच सांगितले होते. मात्र, शासन गेलं की त्यांना विसरला आहात. जनतेच्या प्रश्‍नांचं भांडवल करणारा आणि श्रेयासाठी काम करणाऱ्यांपैकी मी नाही. मला श्रेय द्यावं म्हणून मी कुणाला विनंती केलेली नाही. एक वेळ माझं अभिनंदन केलं नाही तरी चालेल; परंतु मुख्यमंत्री आणि नगरविकास राज्यमंत्र्यांचे अभिनंदन करताय, याचा मला सर्वांत जास्त आनंद आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

Avinash Jadhav: अविनाश जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल, 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, काय आहे प्रकरण?

Delhi Bomb Threats: दिल्ली बॉम्बच्या धमक्यांचे दक्षिण कोरिया, फ्रान्स कनेक्शन; मेल डोमेन अन् वीपीएनबाबत धक्कादायक माहिती समोर

लग्नामुळे महिलेचे स्वातंत्र्य संपत नाही; तिला स्वतःच्या आवडीनुसार जगण्याचा पूर्ण अधिकार; उच्च न्यायालयाचा निर्वाळा

Latest Marathi News Live Update : बुलढाण्यात डॉल्बी वाजवण्यास बंदी, प्रसासनाचा निर्णय

SCROLL FOR NEXT