पश्चिम महाराष्ट्र

शेतकरी मृत्यूचा अहवाल सदाभाऊ खोतांनी मागविला

सकाळवृत्तसेवा

सांगली - मल्लेवाडी (ता. मिरज) येथील द्राक्ष बागायतदार दादासाहेब तात्यासाहेब चौगुले (वय ३८)  या शेतकऱ्याच्या मृत्यू प्रकरणी अहवाल द्या, असे आदेश कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी जिल्हा कृषी विभागाला दिले आहेत. इस्लामपूर येथे कृषी अधिकाऱ्यांसोबत त्यांनी चर्चा केली. 

द्राक्ष बागेवर आलेल्या दावण्या रोगावर औषध फवारणी करताना  चौगुले यांना चक्कर आली. त्यात ते कोसळले. रुग्णालयात नेत असताना त्यांचा मृत्यू झाला.  शवविच्छेदन अहवालानुसार त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांचा व्हिसेरा राखून ठेवला आहे. हे  प्रकरण संवेदनशील आहे. यवतमाळला दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याने कृषी विभागात आधीच खळबळ उडाली आहे. त्यात मल्लेवाडीतील दुर्घटनेमुळे हा विभाग खडबडून जागा झाला आहे. 

कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत म्हणाले,‘‘या प्रकरणी मी अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली आहे. दुर्घटनेबाबत अहवाल मागवला आहे. त्यातून जी माहिती येईल त्याआधारे पुढील कार्यवाही केली जाईल. आम्ही शेतकऱ्यांसोबत आहोत.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Pune Visit : सुरेश कलमाडींनी पुण्यात पंतप्रधानांना चप्पल फेकून मारली अन्...

MDH Everest Spices: एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांवर मालदीवनेही घातली बंदी; कंपनीने दिले स्पष्टीकरण

IPL 2024 : थाला फॉर अ रीजन! धोनीसाठी पठ्ठ्याने गर्लफ्रेंडसोबत केला ब्रेकअप; पोस्टरचा सोशल मीडियावर धुमाकूळ

Mumbai Local News : रुळावरून घसरली CSMT लोकल; रेल्वे वाहतूक ठप्प ! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी प्रवाशांचे प्रचंड हाल !

PM Modi : 'सामान्य नागरिकाच्या घराचं वीज बिल शून्यावर आणणं माझं ध्येय'; पंतप्रधान मोदींनी सांगितला फ्युचर प्लॅन

SCROLL FOR NEXT