पश्चिम महाराष्ट्र

काम नसल्याने विरोधकांचा कडेगावच्या तहसीलवर मोर्चा

संतोष कणसे

कडेगाव - विरोधकांना काम नाही, त्यामुळे टंचाई काळातील वीज बिलांची रक्कम भरण्यासही शासन कटिबद्ध असताना ताकारी, टेंभूसाठी विरोधकांनी कडेगाव तहसीलवर मोर्चा काढला. ते का हे समजत नाही. काहीच काम नाही. काही तरी करावे म्हणून मोर्चा काढला असावा, अशी टीका जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी नेर्ली (ता. कडेगाव) येथे केली.

ते म्हणाले, ‘‘सिंचन योजना चालविण्यासाठी भाजप शासन सक्षम आहे. आठ दिवसांत ताकारी, टेंभूची आवर्तने सुरू होतील. कसलीही शंका नाही. मुख्यमंत्र्यांनी सिंचन योजना सक्षम करण्याचे आश्‍वासन दिले आहे. टंचाईतून वीजबिलांची जी रक्कम भरावयाची आहे ती भरण्यास शासन कटिबद्ध आहे. कारखाने शेतकऱ्यांच्या ऊसबिलातून वीजबिल व पाणीपट्टीची रक्कम कपात करून योजनांकडे वर्ग करीत आहेत. योजना नियमितपणे सुरू आहेत. उसाशिवाय इतर पिकांसाठी पाणीपट्टी वसुली जलसंपदा विभाग करीत नाही, हाही मुद्दा महत्त्वाचा आहे. वीजबिलाबाबत तफावत निर्माण होतेय. तेव्हा काहीही झाले तरी शासन शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही.’’

ते म्हणाले, ‘‘सिंचन योजनांचे वीजबिल हे शेतकऱ्यांना परवडत नाही. तेव्हा या योजना सक्षमपणे चालवायच्या असतील तर शेतकऱ्यांना वीजबिलात सवलत मिळणे गरजेचे आहे. सध्या पाणीपट्टी व वीजबिलाची एकरी रक्कम ही दहा हजारांपर्यंत गेली आहे. या बिलाचा ८० टक्के बोजा हा शासनाने उचलावा; तर २० टक्के रक्कम शेतकरी भरतील, असा प्रस्ताव शासनाकडे दिला आहे. शासन सकारात्मक आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास शेतकऱ्यांना एकरी केवळ दोन ते अडीच हजार रुपये रक्कम भरावी लागेल.’’ 

ते म्हणाले, ‘‘भाजप सत्तेवर आले तेव्हा इतिहासात पहिल्यांदा शेतकऱ्यांच्या उसाला एफआरपी अधिक २०० रुपये फॉर्म्युर्ल्यानुसार दर मिळाला. हमीभाव मिळू लागला. शेतकऱ्यांबाबतीत अनेक महत्त्वाचे निर्णय होत आहेत. शासनाच्या पूर्ण पाच वर्षांत विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना भरपूर फायदा होणार आहे. भाजप शेतकरीविरोधी नाही, तर शेतकऱ्यांबरोबर आहे.’’
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Voting 3rd Phase : महाराष्ट्रात सकाळी नऊ वाजेपर्यंत सर्वात कमी मतदान; पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक मतदानाची नोंद

मतदान करण्यासाठी गेलेला मतदार जाग्यावरच कोसळला, अन्... महाड तालुक्यातील धक्कादायक घटना

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू; मल्लिकार्जुन खर्गेंनी बजावला मतदानाचा हक्क

Rajendra Gavit: शिवसेनेचा खासदार भाजपच्या गळाला, देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश

सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणी कारवाई, शूटर्सचा सर्वात मोठ्या मदतनीसाला राजस्थानमधून अटक

SCROLL FOR NEXT