माजी उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी मोर्चाचे नेतृत्व केले.
माजी उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. 
पश्चिम महाराष्ट्र

सरकारच्या विरोधात राष्ट्रवादीचा हल्लाबोल मोर्चा

सचिन शिंदे

कऱ्हाड (सातारा): आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळाला अभिवादन करून राष्ट्रवादीने भाजप सरकारच्या विरोधात हल्लाबोल मोर्चा काढला. शक्तीप्रदर्शन करत काढलेल्या मोर्चात जिल्ह्यात अनेक दिग्गज्ज नेते सहभागी झाले होते. माजी उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. राष्ट्रवादीच्या मोर्चाचे चौका-चौकात वेगळ्या पद्धतीने स्वागत करून सरकारचा निषेध नोंदवण्यात आला. प्रितीसंगम ते दत्ता चौक व पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला वळसा घालून कर्मवीर बाऊराव पुतळ्याजवळ मोर्चा नेण्यात आला. मोर्चात सामील बैलगाड्या, कार्यकर्त्यांची घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता. राष्ट्रवादीने ताकद दाखवत सरकार विरोधी केलेल्या यल्गाराची चर्चा शहरात रंगली होती.

वाढती महागाई, फसलेले निर्णय, कर्जमाफीयासह अनेक मागम्यांना घेवून राष्ट्रवादीने येथे हल्लाबोल मोर्चास प्रारंभ केला. ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून राज्यभर राष्ट्रवादी हल्लाबोल मोर्चा काढणार आहे. त्याची सुरवात येथून झाली. मोर्चात राष्ट्रवादीचे नेते अजीत पवार, माजी मंत्री जयंत पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार शिवेंद्रराजे भासले यांच्यासह पदाधिकारी उपस्थीत होते. मार्चास प्रतिसंगमावरून प्रारंभ झाला. त्यावेळी मोट्या प्रमाणात घोषणाबाजी करण्य़ात आली. चौका-चौकात मार्चाची वाट पाहत थांबलेल्या लोकांनी त्यात सहभाग घेतला. मोर्चानंतर वाहनांच्याही रांगा दिसत होत्या. येथील नेहरू चौकातही मोर्चाचे स्वागत झाले. येथील आझाद चौकात दुधाला हमीभाव देण्यात यावा, असी मागमी करण्यात आली. त्यावेळी अजीत पवार व नेत्यांकडे दुधाने भरलेल्या किटल्या देण्यात आल्या. त्यासह भोई समाजाच्या प्रश्नांकडे होणारे सरकारने केलेल्या दुर्लक्षाचाही निषेध नोंदवण्यात आला. यावेळी भोई समाजातील बांधव उपस्थीत होते. येथील गणपती मंदीर परिसरातही काही नागरींकांनी त्यांच्या मागण्यांचे निवेदन अजीत पवार यांच्य़ाकडे सुपूर्त केले. यशवंत हायस्कूल चोकात काही लोकांशी श्री. पवार व त्यांच्या नेत्यांनी संवाद साधला. त्यावेळी अनेक मागण्यांकडे सराकरचे लक्ष वेधले.

मोर्चाच्या प्ररांभ तीन बैलागाड्यातून शेतकरी सामील झाले होते. त्यावेळी दहा ते बारा शेतकर्यांनी आसूड आणला होता. तो प्रत्येक चौकात वाजवून सरकारचा निषेध करण्यात येत होता. यावेळी सरकारच करायच काय... खाली मुंडी वर पाय.... शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालीच पाहिजे.... महिलांना न्याय मिळालाच पाहिजे घोषणांनी यावेळी परिसर दणाणून गेला. प्रत्येक कार्यकर्ता घोषणा देत होता. नेते त्याला उत्तर देत होते. दत्तचौकात मोर्चा आला, त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. त्यानंतर मोर्चा पुन्हा प्रांताधिकारी कार्यालयाकडे वळवण्यात आला. तेथे मोर्चाची सांगता जाली. मात्र, त्यावेळी झालेल्या जाहीर सभेतही अनेक नेत्यांना सरकावर जोरदार टिका केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

Google Layoffs : गुगलमधील कर्मचारी कपात सुरूच.. कोअर टीममधून 200 जणांना नारळ! भारत-मेक्सिकोमध्ये देणार संधी

Shyam Rangeela: मेरे प्यारे देशवासियो... मोदींची मिमिक्री करत प्रसिद्ध झालेल्या कॉमेडियनचे वाराणसीतून पंतप्रधानांना आव्हान

CSK vs PBKS : 'सेल्फिश' धोनी! शेवटच्या ओव्हरमधील ड्राम्यानंतर थाला होतोय ट्रोल, Video Viral

Share Market Today: शेअर बाजार उघडताच 'या' शेअर्सवर ठेवा लक्ष; काय आहे तज्ज्ञांचा अंदाज?

SCROLL FOR NEXT