पश्चिम महाराष्ट्र

नगरपालिका ३५ वर्षांतील कागदांची धूळ झटकणार

सकाळवृत्तसेवा

सातारा - सातारा नगरपालिकेत साचलेल्या कागदपत्रांच्या गठ्ठ्यांवरील धूळ आता झटकली जाणार असून गेल्या ३५ वर्षांचा सुमारे दहा टनांहून अधिक कागदपत्रांचा निपटारा होणार आहे. ‘झिरो पेंडन्सी’ अभियानांतर्गत आजपासून या कामाला सुरवात झाली. 

कामकाजातील विलंब टाळून ठराविक कालमर्यादेत नागरिकांची आणि प्रशासकीय कामे निर्गत करून लोकाभिमुख व गतिमान प्रशासन देण्यासाठी पुणे विभागातील सर्व पालिकांमध्ये ‘झिरो पेंडन्सी’ अभियान सुरू करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी दिल्या आहेत. या अनुषंगाने पुण्यात नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांची कार्यशाळाही झाली. या अभियानात पालिकेकडे असलेल्या सर्व प्रलंबित प्रकरणांची संख्या निश्‍चित करण्यात येणार आहे. त्यानंतर त्याचे टप्पे पाडून अनावश्‍यक कागदपत्रांचा निपटारा करण्यात येणार आहे. ‘ए’, ‘बी’, ‘सी’ आणि ‘डी’ अशा पद्धतीने पालिकेकडे असलेल्या प्रलंबित प्रकरणांच्या कागदपत्रांचे वर्गीकरण करण्यात येणार आहे. ‘ए’ म्हणजे कायमस्वरूपी नष्ट करणे, ‘बी’ म्हणजे ३० वर्षांसाठी, ‘सी’ म्हणजे पाच ते दहा वर्षे आणि ‘डी’ म्हणजे काम झाल्यानंतर लगेच त्या कागदपत्रांचा निपटारा करण्यात येणार आहे. पालिकेकडे गेल्या ३५ वर्षांतील कागदपत्रे ठेवण्यात आली आहेत. त्यातील काही कागदपत्रांच्या गठ्ठ्यांवरील धूळही गेल्या ३५ वर्षांत कोणी झटकलेली नसेल. अशी कागदपत्रे वर्गीकरणानंतर नष्ट केली जाणार आहेत. 

पालिकेचे मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी सांगितले, ‘‘पालिकेच्या शहर विकास विभाग, पाणीपुरवठा या विभागांत आम्ही झिरो पेंडन्सीच्या निमित्ताने याआधीच कामाला सुरवात केली आहे. या अभियानामध्ये उर्वरित कामाला वेग येईल. पूर्वीची प्रलंबित प्रकरणे निर्गत करून रोजचे काम रोजच्या रोज करण्यावर भर असेल.’’

‘झिरो पेंडन्सी’मुळे लोकाभिमुख व गतिमान शासन लोकांना मिळेल. जनतेचे प्रश्‍न वेळेत मार्गी लागण्यास निश्‍चितच मदत होईल.
- शंकर गोरे, मुख्याधिकारी, सातारा 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: "....म्हणून आम्ही केजरीवालांच्या जामिनाचा विचार करु शकतो"; सुप्रीम कोर्टाचा ईडीला इशारा

Supriya Sule : आईवर बोलला तर करारा जबाब देईन - सुप्रिया सुळे

Arvind Kejriwal : ''केजरीवाल अन् सिसोदिया यांच्याविरोधात एकसारखेच पुरावे कसे? सिंघवींचा सुप्रीम कोर्टात युक्तिवाद

Rahul Gandhi: राहुल गांधींनी रायबरेली निवडल्यानं निरुपम यांचा हल्लाबोल; म्हणाले, पळून गेले...

SRH vs RR, IPL 2024: 'भयानक अंपायरिंग...', हेडची बॅट हवेत होती असं सांगत माजी भारतीय क्रिकेटरने थर्ड अंपायरवर साधला निशाणा

SCROLL FOR NEXT