Amol-Kolhe
Amol-Kolhe 
पश्चिम महाराष्ट्र

महाराष्ट्र कोणाची जहागिरी नाही - अमोल कोल्हे

सकाळ वृत्तसेवा

नगर - महायुती सरकार विकासाची कामे करण्यात अपयशी ठरले आहे. जनतेची सेवा करायची सोडून सरकार यात्रा काढत आहे. महायुतीने महाजनादेश व जनसंवाद, या यात्रा जनतेवर लादल्या आहेत. महाराष्ट्र कोणाची जहागिरी नाही, अशी टीका खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी येथे केली. 

शासकीय विश्रामगृहावरील पत्रकार परिषदेत कोल्हे बोलत होते. ते म्हणाले, 'यात्रेत फडणवीस म्हणतात, "मी मुख्यमंत्री'; तर शिवसेनेची जनसंवाद यात्राही "मी मुख्यमंत्री होणार' यासाठीची आहे. राष्ट्रवादीची "शिवस्वराज्य यात्रा' रयतेने मनाने स्वीकारली आहे. ती जनतेच्या कल्याणासाठी आहे. जनताच महायुती सरकारला धडा शिकवेल. मुख्यमंत्र्यांनी मेगा भरती करून रोजगाराची समस्या मिटवू, असे सांगितले. मात्र, तसे होताना दिसत नाही. बहुतांश कंपन्या बंद पडल्या आहेत. राज्य पुराच्या संकटात असताना सत्ताधाऱ्यांना यात्रा काढण्याची गरज काय?'' 

'केंद्र सरकारने 370 कलम रद्द केले. या निर्णयाला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा विरोध नाही, तर निर्णयाच्या पद्धतीला विरोध आहे,'' असेही कोल्हे यांनी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Pune Visit : सुरेश कलमाडींनी पुण्यात पंतप्रधानांना चप्पल फेकून मारली अन्...

MDH Everest Spices: एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांवर मालदीवनेही घातली बंदी; कंपनीने दिले स्पष्टीकरण

IPL 2024 : थाला फॉर अ रीजन! धोनीसाठी पठ्ठ्याने गर्लफ्रेंडसोबत केला ब्रेकअप; पोस्टरचा सोशल मीडियावर धुमाकूळ

Mumbai Local News : रुळावरून घसरली CSMT लोकल; रेल्वे वाहतूक ठप्प ! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी प्रवाशांचे प्रचंड हाल !

PM Modi : 'सामान्य नागरिकाच्या घराचं वीज बिल शून्यावर आणणं माझं ध्येय'; पंतप्रधान मोदींनी सांगितला फ्युचर प्लॅन

SCROLL FOR NEXT