... so the last day of Anna's silence tomorrow 
पश्चिम महाराष्ट्र

...तर अण्णांच्या मौनाचा उद्या अखेरचा दिवस? 

सकाळ वृत्तसेवा

राळेगणसिद्धी : महिलांवरील वाढत्या अत्याचाराविरोधात कठोर कायदा व्हावा व "निर्भया'च्या गुन्हेगारांना त्वरित फाशीची शिक्षा व्हावी, या मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सुरू केलेले मौन आंदोलन आज 42व्या दिवशीही सुरू होते. "निर्भया'च्या गुन्हेगारांना फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी होईपर्यंत मौन सोडणार नाही, असे हजारे यांनी आधीच स्पष्ट केले आहे. नियोजित वेळेनुसार शनिवारी (1 फेब्रुवारी) "निर्भया'च्या गुन्हेगारांना फाशी दिल्यास हजारे त्याच दिवशी मौन सोडतील, अशी आशा व्यक्त होत आहे. 
हजारे यांनी 9 डिसेंबर 2019 रोजी केंद्र सरकारला पत्र लिहून, "निर्भया'च्या गुन्हेगारांना फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी आणि महिला अत्याचारविरोधी कठोर कायदा करण्याची मागणी केली होती. त्यासाठी 10 दिवसांत निर्णय न झाल्यास मौन आंदोलनाचा इशारा त्यात दिला होता. अखेर 20 डिसेंबरपासून अण्णांनी मौन धारण केले. आज या आंदोलनाचा 42वा दिवस होता. या आंदोलनादरम्यान हजारे यांना राज्यातून आणि देशातून मोठा पाठिंबा मिळाला. अनेक महिला, कार्यकर्ते, विद्यार्थ्यांनी हजारे यांची भेट घेऊन पाठिंबा दिला. 

अण्णा आणि 44 दिवसांचे आंदोलन 
"निर्भया'च्या गुन्हेगारांना 1 फेब्रुवारीला फाशी दिल्यास आणि त्याच दिवशी अण्णांनी मौन मागे घेतल्यास हे आंदोलन 44 दिवसांचे ठरेल. या आधी त्यांनी 12 वेळा मौन आंदोलन केले होते. सन 1990मध्ये सामाजिक वनीकरणातील भ्रष्टाचाराच्या विरोधात आंदोलन व उपोषण करूनही चौकशी होत नसल्याच्या निषेधार्थ त्यांनी 44 दिवस मौन आंदोलन केले होते. त्यानंतर सरकारने केलेल्या चौकशीत 13 अधिकारी दोषी आढळून आले होते व त्यांच्यावर कारवाई झाली होती. 

केंद्राची भूमिका काय? 
हजारे यांनी महिलांवरील वाढत्या अत्याचाराबाबत कठोर कायदा करण्याची मागणी या आंदोलनाच्या निमित्ताने केली आहे. मात्र, या आंदोलनाच्या काळात आजपर्यंत केंद्र सरकारतर्फे कोणीही याबाबतची भूमिका मांडली नाही. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आणि खासदार डॉ. सुजय विखे यांच्या व्यतिरिक्त संसदेशी संबंधित कोणीही हजारे यांच्या भेटीला आले नाही. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

केरळमध्ये मेंदू खाणाऱ्या अमीबाचं थैमान, आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू; कसा होतो संसर्ग?

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 'शेतापर्यंत आता हक्काचा रस्ता; गावनिहाय शिवारफेरी, रस्त्याला संकेतांक मिळणार; वादावादी मिटणार

CET 2025 : आता केंद्रांपर्यंत जाणे हीच ‘परीक्षा’, सारथी, बार्टी, महाज्योतीचा भोंगळ कारभार; विद्यार्थ्यांना फटका

Nagpur Crime: अकरा वर्षीय मुलाची अपहरण करून हत्या; खापरखेडा जवळील चनकापूर हादरले, तिघांना अटक

Latest Maharashtra News Updates : कुख्यात गुंड छोटा राजनचा जामीन सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द

SCROLL FOR NEXT