Bank Loan esakal
सोलापूर

यंदा शेतकऱ्यांना मिळणार 4200 कोटींचे कर्ज! तीन लाखांच्या कर्जावर शून्य टक्‍के व्याज

1 एप्रिलपासून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बॅंकांच्या माध्यमातून खरीप व रब्बी हंगामासाठी चार हजार 200 कोटींचे पीक कर्जवाटप केले जाणार आहे. सोलापूर हा रब्बीचा जिल्हा असतानाही खरिपात कर्ज मागणी सर्वाधिक होते. त्यामुळे रब्बी व खरीप हंगामात समसमान कर्जवाटप केले जाणार आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : नववर्षात 1 एप्रिलपासून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बॅंकांच्या माध्यमातून खरीप व रब्बी हंगामासाठी चार हजार 200 कोटींचे पीक कर्जवाटप केले जाणार आहे. सोलापूर हा रब्बीचा जिल्हा असतानाही खरिपात कर्ज मागणी सर्वाधिक होते. त्यामुळे यंदा रब्बी व खरीप हंगामात समसमान कर्जवाटप केले जाणार आहे.

सोलापूर हा सर्वाधिक साखर कारखाने असलेला जिल्हा म्हणून ऊस गाळपात महाराष्ट्रात अग्रेसर आहे. सोलापूर हा रब्बीचा जिल्हा असतानाही मागील काही वर्षांत जिल्ह्यात खरिपाचे क्षेत्र वाढले आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राष्ट्रीयीकृत व खासगी बॅंका, जिल्हा मध्यवर्ती बॅंकांच्या माध्यमातून जवळपास साडेतीन हजार कोटींचे कर्जवाटप केले जाते. शेतकऱ्यांकडून कर्जाची मागणी वाढू लागल्याने यंदा नाबार्डच्या सर्व्हेनुसार शेतकऱ्यांना चार हजार 200 कोटींचे कर्जवाटप केले जाणार आहे. 1 एप्रिलपासून (नववर्षात) रब्बी व खरीप हंगामात मागेल त्या शेतकऱ्याला कर्ज वाटप केले जाणार आहे. ज्या शेतकऱ्याचा सीबिल स्कोअर किमान 650 पेक्षा अधिक आहे, त्यांना सहजपणे कर्ज मिळणार आहे. तत्पूर्वी, तो शेतकरी कोणत्याही बॅंकेचा तथा वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा, असाही निकष लावण्यात आला आहे. यंदा शेतकऱ्यांना प्रत्येक पिकासाठी वाढीव कर्ज दिले जाणार आहे. त्याचा प्रस्ताव बॅंकांनी राज्यस्तरीय बॅंकर्स कमिटीच्या माध्यमातून राज्य सहकारी बॅंकेला पाठवला आहे. त्यानंतर बॅंकांच्या कर्जवाटपाचे उद्दिष्ट निश्‍चित झाले असून, त्यानुसार शेतकऱ्यांना पीक कर्ज वितरीत केले जाणार आहे.

सोलापूर हा रब्बीचा जिल्हा असतानाही खरिपाचे क्षेत्र वाढत आहे. त्यामुळे आता यंदा खरीप व रब्बीसाठी शेतकऱ्यांना 50-50 टक्‍के कर्जवाटप होईल. 1 एप्रिलपासून पीक कर्जवाटप करण्याचा कृती आराखडा तयार केला असून, जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेनंतर त्याची प्रभावी अंमलबजावणी केली जाणार आहे.
- प्रशांत नाशिककर, जिल्हा व्यवस्थापक, अग्रणी बॅंक

  • ठळक बाबी...
    - नाबार्डकडून झालेल्या सर्व्हेनुसार यंदा खरीप-रब्बीसाठी बॅंका कर्जवाटप करतील
    - जिल्ह्यातील जवळपास दोन लाख शेतकऱ्यांना मिळणार खरीप-रब्बीसाठी कर्ज
    - शेतकऱ्यांना 4200 कोटींचे कर्जवाटप होणार; बॅंकांना उद्दिष्ट पूर्ण करावे लागणार
    - बॅंकांना यंदा पात्र शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंतचे बिनव्याजी कर्जवाटप करावे लागणार
    - मागील वर्षीच्या तुलनेत यंदा शेतकऱ्यांना जवळपास साडेचारशे कोटींचे वाढीव पीककर्ज

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Insurance Sector: मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक! १००% FDI ला मंजुरी; इंश्योरन्स क्षेत्रात मोठा धमाका, पण LIC साठी नियम वेगळे

रितेश देशमुखने घेतलं पुण्याच्या दगडूशेठ गणपतीचं दर्शन, म्हणाला...'माझे वडिल विलासराव देशमुख यांना...' Viral Video

nasrapur case updates: 'माझ्या मुलीला न्याय मिळेपर्यंत.. पीडित मुलीच्या वडिलांची संतप्त प्रतिक्रिया...

Pune ATS Arrest: येरवडा जेलमधून पळाल्यानंतर ६ वर्षे फरार राहिलेला मोक्का आरोपी अजिंक्य कांबळे एटीएसच्या सापळ्यात

Latest Marathi News Live Update : नीलम गोऱ्हे यांची सोशल मीडियावरील गैरवापराबाबत तीव्र प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT