logo
logo 
सोलापूर

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी रयत क्रांती संघटनेचा जागरण गोंधळ 

प्रमोद बोडके

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी, वादळी वाऱ्यामुळे व नद्यांना आलेल्या महापुरामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानीकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी रयत क्रांती संघटनेच्यावतीने आज सोलापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आले. जागरण गोंधळ आंदोलना सोबतच संघटनेच्यावतीने एक दिवसाचे धरणे आंदोलनही करण्यात आले. 

रयत क्रांती संघटनेचे राज्याचे कार्याध्यक्ष दीपक भोसले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी रयत क्रांती संघटनेचे सोलापूर जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी सहभागी झाले होते. रयत क्रांती संघटनेचा नारा, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा या सह इतर घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दुमदुमून गेला होता.

जिरायत भागातील नूकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्‍टरी 50 हजार रुपये व बागायत, फळबागायतदार शेतकऱ्यांना प्रति हेक्‍टरी एक लाख रुपयांची नुकसान भरपाई मिळावी अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली. शेतकऱ्यांच्या शेतीपंपाचे संपूर्ण वीज बिल माफ करावे, पुरामुळे नदीकाठच्या ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी वाहून गेल्या आहेत. त्यांना एकरी 50 हजार रुपयांची मदत मिळावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Poonch Attack 2024: पुंछ हल्ल्यामागे पाकिस्तानची संघटनेचा हात, तीन ते चार दहशतवाद्यांनी...

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 06 मे 2024

Women’s T20 World Cup: स्कॉटलँडने रचला इतिहास, वर्ल्ड कपचं पहिल्यांदाच मिळवलं तिकीट; श्रीलंकाही ठरले पात्र

Sharad Pawar : बारामतीकरांना धक्का अशक्य;निवडणुकीची अमेरिकेतही उत्सुकता

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

SCROLL FOR NEXT