सोलापूर ः भाजपच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यासाठी उपस्थित असलेले पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते.  
सोलापूर

सत्ता गेल्यानंतर "यांचे' पहिलेच आंदोलन 

सकाळवृत्तसेवा

सोलापूर ः मागील पाच वर्ष राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपच्यावतीने आज राज्यभर सरकारच्या विरोधात धरणे आंदोलन केले जात आहे. पाच वर्ष सत्ता उपभोगल्यानंतर रस्त्यावर उतरणे तसे जिकिरीचे होते. मात्र, सोलापूर जिल्ह्यातील सर्वच तहसील कार्यालयासमोर भाजपच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी सरकारच्या धोरणाचा निषेध केला. 

राज्यात सत्तेवर असलेल्या उद्धव ठाकरे सरकारने जनादेश नसतानाही सत्तेचा सोपान सर केला आहे. ठाकरे सरकारने भाजप सरकारच्या काळात सुरू केलेल्या वेगवेगळ्या योजनांना स्थगिती देण्यास सुरवात केली आहे. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या असलेल्या जलयुक्त शिवार योजनेला ठाकरे सरकारने स्थगिती दिली आहे. राज्यात सत्तेवर आल्यास शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याची भाषा ठाकरे सरकारने केली होती. मात्र, शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात महिला सुरक्षित होत्या. मात्र, राज्यात ठाकरे सरकार सत्तेवर आल्यापासून राज्यातील महिलांवर अत्याचार वाढले आहेत. त्याचाही आजच्या निदर्शनाच्या माध्यमातून सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. 

फडणवीस सरकारने बारामतीला उद्योगधंद्यासाठी जाणारे अतिरिक्त पाणी बंद करून ते सातारा, सोलापूर या जिल्ह्यातील दुष्काळी भागाला देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, ठाकरे सरकारने ते पाणी पुन्हा बारामतीला देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय घेऊन ठाकरे सरकारने या भागातील शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. त्याचा निषेधही आजच्या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आला. राज्यात कोणत्या प्रकारची विकासकामे होत नाहीत. राज्य फक्त ठाकरे, पवार या घराण्यांचाच विकास होत असल्याची टीकाही भाजपच्या नेत्यांनी यावेळी केली. "तीन तिघाडा, काम बिघाडा' अशी स्थिती या सरकारची झाली आहे. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या ठाकरे सरकारचा यावेळी निषेध व्यक्त करण्यात आला. या आंदोलनामध्ये भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, शहराध्यक्ष विक्रम देशमुख, महापौर श्रीकांचन यन्नम, उपमहापौर राजेश काळे, सभागृह नेता श्रीनिवास करली, माजी महापौर शोभा बनशेट्टी, नगरसेविका अश्‍विनी चव्हाण, मनीषा हुच्चे, संजय कोळी, शिवानंद पाटील, कल्पना कारभारी, डॉ. किरण देशमुख, मनीष देशमुख, शालन शिंदे, राजश्री पाटील, अंबिका पाटील, राजश्री चव्हाण, शशिकला बत्तुल, संतोष भोसले, वरलक्ष्मी पुरुड, नागेश भोगडे, सोनाली मुटकिरी, प्रतिभा मुदगल, अनिता कोंडी, राजश्री कणके, निर्मला तांबे, अमर पुदाले, अविनाश पाटील, संगीता जाधव, प्रा. नारायण बनसोडे, विष्णू बरगंडे, मेनका राठोड, रामेश्‍वरी बिर्रु, देवी झाडबुके, विजयालक्ष्मी गड्डम यांच्यासह मंडलाचे पदाधिकारी उपस्थित होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : खवळलेल्या समुद्रामुळे अद्याप संकट कायम; यंत्रणा ‘अलर्ट’, हवामान विभागाचा इशारा काय?

Telangana Police : दीड कोटींचे बक्षीस असलेला कुख्यात माओवादी बंडी प्रकाश पोलिसांना शरण; 45 वर्षांपासून माओवादी संघटनेत होता सक्रिय

'तो जेव्हा सेटवर यायचा तेव्हा...' अभिनेत्री सविता प्रभुणे यांनी सांगितला सलमानसोबत काम करण्याचा अनुभव, म्हणाल्या...'तेरे नामच्या शुटवेळी...'

IND A vs SA A: रिषभ पंत कर्णधार; रजत पाटीदार, आयुष म्हात्रे Playing XI मध्ये! उद्यापासून सुरू होणाऱ्या कसोटीसाठी असा असेल भारताचा संघ

Trimbakeshwar Crime : त्र्यंबकेश्वर खून प्रकरणाला नवे वळण! गुराख्याच्या अटकेनंतरही नातलगांचा पोलिसांवर संशय; बांधकाम व्यावसायिकासह चौघांविरुद्ध तक्रार

SCROLL FOR NEXT