lockdown-abd-11_202005422361.jpg
lockdown-abd-11_202005422361.jpg 
सोलापूर

Breaking ! जिल्ह्यात येणाऱ्या वाहनांची होणार तपासणी; मास्क नसल्यास परवाना होणार निलंबित 

तात्या लांडगे

सोलापूर : शहर- जिल्ह्यातील कोरोना वाढू नये म्हणून जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज (शुक्रवारी) सुधारित आदेश जारी केले आहेत. त्यानुसार जिल्ह्यात येणारी सर्वच प्रवासी वाहने पोलिसांनी तपासावीत, असे निर्देश त्यांनी दिले आहेत.

आदेशातील ठळक बाबी... 

  • सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक वाहनांची होणार तपासणी 
  • वाहनचालक तथा वाहनातील व्यक्‍तींकडे मास्क अथवा सोशल डिस्टन्सिंगचे पालन न केल्यास एक हजारांचा होणार दंड 
  • दुसऱ्यांदा नियमांचे उल्लंघन केल्यास दोन हजारांचा दंड करण्याचे आदेश 
  • दंड होऊनही नियम मोडल्यास सात दिवस वाहन होणार जप्त 
  • दुसऱ्यांदा नियम मोडणाऱ्या वाहनचालकाचा परवाना निलंबनाचेही दिले आदेश 
  • वाहनात अतिरिक्‍त प्रवासी असल्यास प्रत्येकी पाचशे रुपयांचा दंड 


जिल्ह्यात प्रवेश करताना अथवा जिल्ह्यातून बाहेर जाणाऱ्या वाहनांची कडक तपासणी करावी, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी, पोलिस निरीक्षक, सहायक पोलिस निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक, पोलिस हवालदार, पोलिस नाईक, पोलिस शिपाई, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना दिले आहेत. दरम्यान, कारवाई करताना वाहनातील व्यक्‍तीकडे मास्क नसल्यास त्यांना प्रत्येकी एक हजार रुपयांचा दंड करावा, अशा सूचनाही आदेशातून जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. एकदा दंड भरुनही त्या वाहनचालकाने नियमांचे उल्लंघन केल्यास त्याचे वाहन सात दिवसांसाठी जप्त केले जाणार आहे. तर वाहनचालकाचा परवानादेखील निलंबित करण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई करणाऱ्या पोलिस व आरटीओ अधिकाऱ्यांना दिला आहे. तीनचाकी वाहनात तीन तर चारचाकीत चार (चालकासह) प्रवासी असणे बंधनकारक आहे. त्याशिवाय वाढीव प्रवासी असल्यास प्रत्येकी पाचशे रुपयांप्रमाणे दंड केला जाणार आहे. या आदेशानुसार तत्काळ कार्यवाही सुरु करावी, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. तत्पूर्वी, तीन व चारचाकी वाहनचालकांसाठी दंडाची रक्‍कम पाचशे रुपये असून दुसऱ्यांदा तसा प्रकार केल्यास एक हजारांचा दंड केला जाईल, असेही ओदशात नमूद करण्यात आले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT