The conflict between Adinath sugar factory board of directors and the workers escalated  
सोलापूर

'आदिनाथ'चे संचालक मंडळ आणि कामगारातील संघर्ष वाढला; पगारीचा प्रश्न मार्गी लावल्याशिवाय साखर विक्री करू नये 

अण्णा काळे

करमाळा (सोलापूर) : श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष धनंजय डोंगरे यांनी कारखान्याची साखर विक्री करण्याचा कामगाराच्या बैठकीत निर्णय झाला असल्याची माहिती दिली आहे. तर दुसरीकडे कामगारांच्या पगारीचा प्रश्न मार्गी लावल्याशिवाय साखरेचे एकही पोते बाहेर जाऊ देणार नाही, अशी भूमिका कामगारांची असल्याचे कामगार संघटनेचे अध्यक्ष नानासाहेब साखरे यांनी सांगितले आहे. तसे पत्र कामगार संघटनेने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व तहसीलदार समीर माने यांना दिले आहे. त्यामुळे एकीकडे कारखाना भाडेतत्वावर देण्याच्या हालचाली सुरू असतानाच साखर विक्रीवरून कामगार व संचालक मंडळ यांच्यातील संघर्ष वाढला आहे. 

आदिनाथ कारखान्याच्या कामगारांच्या 53 महिन्याच्या पगारी थकल्या आहेत. पगाराच्या मुद्‌द्‌यावर आतापर्यंत कामगारांनी अनेक वेळा आंदोलने, रस्ता रोको, उपोषणे केली आहेत. तरीही पगारीचा प्रश्न सुटला नाही. सध्या आदिनाथ कारखाना बंद आहे. कारखान्याची साखर विक्री करून बॅंकेचे कर्ज देण्याचा संचालक मंडळाचा प्रयत्न आहे. तर आधी पगारीचा प्रश्न सोडवा, असा आग्रह कामगाराचा आहे. त्यातूनच हा नवा वाद पुढे आला आहे 
18 जुलै रोजी बागल गटाचे नेते मकाईचे अध्यक्ष दिग्विजय बागल, आदिनाथचे अध्यक्ष धनंजय डोंगरे यांनी साखर कारखान्याकडील साखर विक्री करण्यासंदर्भात कामगारांची बैठक बोलवली होती. या बैठकीत साखर विक्रीला कामगारांची सहमती आहे, असे अध्यक्ष धनंजय डोंगरे यांनी सांगितले आहे. तर दुसरीकेड अशी कामगाराची सहमती नसल्याचे पत्रक कामगार संघटनेने काढले आहे. 
याबाबत कामगार संघटनेने जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, साखर विक्रीसाठी कामगारांचा विरोध आहे. कामगारांच्या चार वर्षाच्या पगारी होणे गरजेचे आहे. कामगाराच्या पगारी संदर्भात औद्योगिक न्यायालयात सहाशे तक्रारी दाखल आहेत. साखर कारखान्यांकडे उपलब्ध असलेल्या साखरेची विक्री करून त्यातून कामगारांच्या पगारी करण्याविषयी औद्योगिक न्यायालयात तडजोड झाल्याशिवाय साखरेचे एकही पोते कारखान्याच्या बाहेर निघू देणार नाही, असे निवेदनात म्हटले आहे. 

कारखान्याच्या कामगार संघटनेचे अध्यक्ष नानासाहेब साखरे म्हणाले, की लॉकडाउन असताना 300 कामगार जमा करून साखर विक्रीचा निर्णय घेतल्याचे अध्यक्ष धनंजय डोंगरे सांगत आहेत. जमावबंदी असताना ही बैठक झाली कशी? याची चौकशी झाली पाहिजे. संचालक मंडळाने आमचे संसार उघडयावर आणले आहेत. साखर विक्रीतून अध्यक्ष व संचालक मंडळाला कमिशन खायचे आहे. संचालक मंडळाने कारखाना चालवण्यासाठी प्रयत्न करावेत. कारखाना चालला पाहिजे ही आमची भूमिका आहे. कामगारांच्या कुंटुंबात अर्थिक अडचणी आहेत. आतापर्यंत चार कामगारांनी आत्महत्या केल्या आहेत. आणखी आत्महात्या होऊ नये यासाठी आमचे प्रयत्न आहेत. 

संपादन : वैभव गाढवे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Election: अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीची बीएमसी निवडणुकीत एन्ट्री? दोन्ही मुलींकडून वडिलांसोबत अर्ज दाखल; कोणत्या जागेवरून लढणार?

Marathi Weekly Tarot Horoscope: लक्ष्मी योगामुळे वृषभ, मिथुन, कर्कसह 5 राशींना मिळणार मोठा आर्थिक लाभ; वाचा साप्ताहिक टॅरो राशिभविष्य

Stock Market Holiday : NSE कडून 2026 साठी सुट्ट्यांची यादी जाहीर; 15 दिवस शेअर बाजार बंद! 1 जानेवारीला बाजार सुरू राहणार?

Municipal Election 2025 : युतीच्या बैठकीपासून आमदार मिटकरी वंचित; चर्चेतून डावलल्याने नाराजीचा सूर, पक्षाअंतर्गत गटबाजी समोर...

Latest Marathi News Live Update : सोलापूर मनपा प्रभाग ८ मध्ये ठाकरे गट आणि मनसे दरम्यान जोरदार शाब्दिक वाद

SCROLL FOR NEXT