mahpur.jpg 
सोलापूर

कोरोनामुळे खरीपाचा बार फुसका; पावसामुळे रब्बी ही संकटात 

राजाराम माने


केतूर (ता. करमाळा जि. सोलापूर ) : कोरोना महामारीच्या संकटामुळे मार्च महिन्यापासून लॉकडाउन सुरू असल्याने शेतकऱ्यांना खरिपातील पिकांची अक्षरशः वाट लागली. वाहतूक सेवा बंद असल्याने शेतात तयार झालेल्या शेतीमाल मार्केटला नेता न आल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले. त्यामुळे खरिपाचा बार फुसकाच गेलाच आहे. तर दुसरीकडे परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने पिके ही शेतात मोठ्या प्रमाणावर पाणी साचून राहिल्याने सडून व नासून गेली यामुळे खरिपाचा हंगाम गेल्याने आता शेतकऱ्यांच्या नजरा रब्बी हंगामाकडे लागल्या आहेत. 

कोरोना लॉकडाउनमुळे खरीप हंगामातील ज्वारी, मका, बाजरी, कपाशी, मटकी, हुलगा, उडीद व इतर कडधान्य बाजारपेठा बंद असल्याने व्यापारी वर्गाने कमी दरात खरेदी केल्या तर तयार झालेली भाजीपाला पिके तसेच केळी उत्पादकांना मोठा फटका बसला तर कलिंगड, खरबूज, पपई आदी पिकांचे भरघोस उत्पादन मिळूनही हातात मात्र काही शिल्लक राहिले नाही. कांद्यालाही योग्य दर मिळाला नाही. 

आता परतीच्या पावसाने ब्रेक घेतल्याने रब्बी हंगामातील गहू,ज्वारी, हरभरा, सूर्यफूल, तूर आदि पेरण्याचा मार्ग मोकळा झाला असला तरी शेतात मात्र अजून पेरणी योग्य वाफसा झाला नसल्याने शेतकरी वापसा होण्याची वाट पाहत आहेत. गेल्या दोन दिवसापासून परिसरात थंडीचे आगमन झाले शेतकरी येऊन गेलेल्या संकटातून पेरणीसाठी सज्ज झाला आहे यंदाचा खरीप हंगाम पहिल्या टप्प्यातच संकटात आला आहे. 

खरीप हंगामाच्या पिके काढणीच्या काळात व रब्बी हंगामाच्या पेरणी करण्याच्या काळात अतिवृष्टी झाल्याने यामध्ये मका,सोयाबीन इतर कडधान्य भिजून त्यांना कोंब आले तर कांदा रोपे जागेवरच सडून गेली तर भाजीपाला पिके ही जागेवरच सडून नसून गेली यातून वाचलेल्या पिकावर हवामान बदलामुळे रोगांचा प्रादुर्भाव वाढला. सध्या शेतात वापसा नसल्याने रब्बीच्या पेरण्या मात्र लांबल्या आहेत. 
गेल्या सात महिन्यांपासून शेतकरी संकटात सापडला आहे निसर्गही त्याला साथ देत नाही, अशा दुहेरी कात्रीत शेतकरी सापडला आहे नुकसानग्रस्तांना शासनाने जाहीर केलेली मदत कशी ? आणि केव्हा ? मिळणार याकडे शेतकरी राजा मात्र नजर लावून बसला आहे..... 
गुलमोहरवाडी या गावचे शेतकरी सुरेश माने सांगितले की, "सततच्या पावसामुळे शेतीचा हंगाम वाया गेला. लॉकडाउनचा जबर फटका बसला यातून शेतकरी कशी उभारी घेणार ? 

महाराष्ट्र सोलापूर 


संपादन : अरविंद मोटे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोदी सरकार म्हणजे 'देशी ब्रिटिश', असिम सरोदेंच्या निलंबनावरून ठाकरे गट आक्रमक....

Kartik Purnima 2025: दिवे दान केल्याने माता लक्ष्मी अन् भगवान विष्णू कसे प्रसन्न होतात? जाणून घेऊया सविस्तरपणे

Mirabai Chanu : मीराबाई चानूचा ऑलिंपिक मार्ग खडतर; ४९ किलो वजनी गटाला कात्री, आता ५३ किलोत खेळावे लागणार

Ahilyanagar fraud: नफ्याच्‍या आमिषाने तीन कोटींची फसवणूक; शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक नडली, अहिल्यानगर जिल्ह्यात खळबळ

Latest Marathi News Live Update : राज्यात पुढचे 5 दिवस पावसाचे, अनेक जिल्ह्यांना इशारा

SCROLL FOR NEXT