Devendra 
सोलापूर

देवेंद्र फडणवीस म्हणाले, सरकार कधी बदलायचंय ते माझ्यावर सोडा !

हुकूम मुलाणी

मंगळवेढा (सोलापूर) : लोकं मला विचारतात एका मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे काय फरक पडणार आहे? याने काय सरकार बदलणार आहे का? मी म्हणतो सरकार कधी बदलायचंय ते माझ्यावर सोडा. ते बदलू आपण. पण या सरकारला त्यांची जागा दाखवून देण्याची पहिली संधी मंगळवेढ्याच्या मतदारांना मिळाली आहे, असे भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.

महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यापासून नगरपालिका, महानगरपालिका व जिल्हा परिषदांमध्ये सत्ता बदलासाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या करेक्‍ट कार्यक्रमाची चर्चा राजकीय वर्तुळात होत असतानाच, देवेंद्र फडणवीस यांनी आज मंगळवेढा येथे बोलताना "तुम्ही भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या कमळ चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना विजयी करा, उर्वरित करेक्‍ट कार्यक्रम मी करतो, त्याची चिंता करू नका', असे प्रतिपादन केल्याने राज्यात सत्ताबदल होणार का, याची चर्चा यानिमित्ताने सुरू झाली. 

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने ते मंगळवेढा येथे बोलत होते. व्यासपीठावर खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी, खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर, आमदार प्रशांत परिचारक, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार राम सातपुते, आमदार सुभाष देशमुख, जयकुमार गोरे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, सदाभाऊ खोत, राम शिंदे, लक्ष्मण ढोबळे, भाजपचे उमेदवार समाधान आवताडे, बाळा बेघडे, चित्रा वाघ, श्रीकांत देशमुख, शशिकांत चव्हाण, प्रदीप खांडेकर, विजय बुरकूल, सुनील सर्वगौड, माऊली हळणवर आदींसह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. 

फडणवीस पुढे म्हणाले, लोकहितवादी सरकार सत्तेवर येण्यापूर्वी महाविकास आघाडी सरकार होते. एका वर्षात महाविनाश आघाडी सरकार आले. परंतु आता हे सरकार महावसुली आघाडी सरकार झाले आहे. त्यामुळे पोलिस, सामान्य माणूस व शेतकऱ्यांकडून जिथे मिळेल तिथे वसुली करण्याचा सपाटा लावला असून, कोरोनाच्या संकटात वीजबिल वसूल केले. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आम्ही काम बंद आंदोलन केल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांचा आक्रमक पवित्रा लक्षात घेऊन वीज बिल वसुली स्थगितीचा आदेश दिला. परंतु अधिवेशन संपताच वसुलीबाबत त्यांनी पुन्हा आदेश दिले. जवळपास पाच हजार कोटी वसुली या सरकारने शेतकऱ्यांकडून केली आहे आणि बिल्डरांना पाच हजार कोटींची सवलत या सरकारने दिली. 

मोदी सरकारच्या काळात जलसिंचनासाठी 25 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. पोटनिवडणुकीच्या नंतर देखील वीजतोड मोहीम सुरू केली जाणार आहे. पंधरा वर्षांच्या काळात सोलापूर जिल्ह्याला आलेल्या निधीपेक्षा जास्तीचा निधी मागील पाच वर्षाच्या काळात दिला आहे. लबाडाचे आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नाही. त्या प्रकाराने सरकारची भूमिका आहे. तुम्ही समाधान आवताडे यांना निवडून द्या 35 गाव उपसा सिंचन योजनेसाठी या राज्य सरकारने निधी नाही दिला तर मी थेट मोदी सरकारकडून निधी उपलब्ध करतो. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Malegaon News : मालेगावच्या दरेगाव शिवारात 'विषाचा' धूर! अवैध प्लास्टिक कारखान्यांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

IPL 2026 Updates: गतविजेत्या RCB चे सामने मुंबईनंतर पुण्यातही नाही होणार! ५ सामने एकीकडे, तर २ दुसरीकडे; जाणून घ्या ब्रेकिंग न्यूज

Gunratna Sadavarte: 'राज ठाकरे रंग बदले, उद्धव संग मंच पे चढले...' गुणरत्न सदावर्ते यांची होळीनिमित्त राजकीय कविता; Video Viral

Video: ७० वर्षांच्या जावयाची गाढवावरुन मिरवणूक; तरुण जावई पळून गेला अन्...

स्मृती मानधना जगात नंबर १! ODI Ranking मध्ये भारतीय बॅटरची झेप, चार वर्षांनी गोलंदाजीतील इक्लेस्टोनचं सिंहासन खालसा

SCROLL FOR NEXT